Wednesday 26 November 2014

ह्रितिक रोशन!!



नुकताच ह्रितिक रोशनचा रीलीज झालेला बॅंग बॅंग पाहिला. मुळात ज्यावरून सिनेमा ढापलाय (ओके! ऑफिशीअल रिमेक) केलाय त्याच्या कथेमध्ये काडीइतकाही जीव नव्हता. मॉडेलगत कन्फ़्युज फिरणारी कॅमेरून डिआझ, आपण  म्हातारे झालोय हे लपवण्याचा अट्टाहास करणारा टॉम क्रूझ (मला वाटलेलं हा बॉलीवूडचा पेटंटेड फंडा आहे, हॉलीवूडनं कॉपी मारली) आणि प्रचंड गंडलेली कथा यामुळे नाईट ऍण्ड डे सपाटून आपटलेला. दुर्दैवानं हिंदी बॅंग बॅंगनं याच गोष्टी जशाच्या तशा उचलल्या आणि सिनेमा बनवला (रिमेकची गरज काय होती हा वेगळाच मुद्दा). साहसदृश्यं कमालीची चित्रीत झालेली आहेत, एखाद्या हॉलीवूडपटापेक्षाही सरस असे ऍक्शन्स सीन्स या चित्रपटासाठी वापरली होती. पण ते सगळंच एकंदरीत फिकं पडत गेलंय. चित्रपटानं दोनशे करोडचा वगैरे धंदा केल्याच्या बातम्या सर्रास रीलीज झाल्याच्या वीकेंडलाच ऐकू येतात, पण म्हणून तो “चांगला चित्रपट” आहे असं हल्ली म्हणवत नाही. एकेकाळी चित्रपट यशस्वी होणं न होणं हा जुगार होता. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अर्थात चित्रपटांचं अर्थकारण हा पार वेगळा मुद्दा आहे.


बॅंग बॅंगची एकमेव उत्तम बाजू म्हणजे अर्थात कतरीनाचे फ्रेश लूक्स (तिच्या अभिनयाबद्दल बोलण्यासारखं काही असतं तर नक्की लिहिलं असतं) आणि ह्र्तिकचा जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स पण....
प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट म्हणजे त्याच्या चेहर्‍यावर दिसणारं त्याचं वय. चाळीशीला टेकलेला ह्रितिक आताच पंचेचाळीशीचा दिसतोय. सतत काम करत राहणं, चुकीच्या जीवनपद्धती, वैयक्तिक आयुष्यामधले ताणतणाव आणि चित्रीकरणादरम्यान झालेले भयंकर अपघात या सर्वांची गोळाबेरीज त्याच्या देखण्या चेहर्‍यावर हलकीशी होइना का पण जाणवून गेली आणि काळजात चर्र झालं. ह्रितिक रोशन हा आमच्या टीनेजर वयामध्ये आलेला हीरो. मला शाळकरी वयापासून सलमान खान आवडायचा (अजूनही आवडतोच! तो का त्याबद्दल पुन्हा केव्हातरी) पण ह्रितिक “आवडणं” यापलिकडे होता. त्याचे लूक्स, डान्स, स्क्रीनवरचा वावर, त्याचं बोलणं यावर मी तेव्हा फिदा होते, आजही आहे.  २००० च्या दरम्यान अनेक नवीन चेहरे (त्यातही स्टारचिल्ड्रन) पडद्यावर आले, पण त्यापैकी टिकून राहिलेले म्हणजे ह्रितिक, करीना आणि अभिषेक. पैकी अभिषेकनं स्वत:च्या मर्यादा स्वत:च ओळखून त्यानुसार कामं घ्यायला सुरूवात केली. त्यामुळे त्याचे कन्सिस्टंटली सिनेमा येत राहिले पण तो “सुपरस्टार” कधीच बनला नाही, हेही तितकंच खरं. करीनाची करीअर फारच मजेदार आहे. ही ह्रितिकच्याच कहोनाप्यारहै मधून “मला फारसा वाव नाही” असे म्हणत बाहेर पडली (जरी हा निर्णय बबिताचा होता) आणि तिनं रेफ्युजीसारखा अतिशय वेगळा, बॉलीवूडच्या नवीन नायिकेच्या सर्व नियमांचा चोळामोळा करणारा सिनेमा स्विकारला. जेव्हा रेफ़्युजी पाहिला तेव्हा करीना ही कपूर घराण्याची अस्सल वारसदार आहे आणि चित्रपटसृष्टीमध्ये काहीतरी नवीन पायंडा पाडून दाखवेल अशी काहीतरी अपेक्षा वाटली होती. चमेली )())( सारख्या सिनेमांनी या अपेक्षा उंचावल्या. पण मध्येच कधीतरी ती “पू” या इमेजच्या इतक्या प्रेमात पडली की, अक्कलशून्य, सुंदर, मॉडेल दिसणारी वगैरे भूमिका तिला आवडायला लागल्या.. असो, करीनाबद्दल आपण सविस्तर कधीतरी बोलू.



आजचा विषय आहे ह्रितिक. ह्रितिक रोशनचं कहो ना प्यार है मधून पदार्पण हे काही फारसं ब्लॉकबस्टर टाईप होइल वगैरे कुणालाच अपेक्षित नव्हतं. “न्यु किड ऑन द ब्लॉक” इतकीच त्याची ओळख होती. समस्त सिनेसृष्टी त्याच्या आगमनाकडं डोळे लावून बसली आहे, वगैरे चित्र ना पब्लिसिटीमधून रंगवलं ना मीडीयामधून. बहुतेक पब्लिसिटी पाहता हा सिनेमा नायिकाप्रधान असल्याचे चित्र रंगवण्यात आले होते. राकेश रोशन याबाबतीत आधीपासून जीनीयस आहे. स्वत:ला अभिनेता म्हणून सिद्ध करण्यामध्ये जितका कमी पडला होत्या त्याहून अनेक पटीनं त्यानं स्वत:ला दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यानं यापूर्वीच सिद्ध केलं होतं. खरंतर राकेश रोशन “अभिनेता” म्हणून वाईट नव्हता. त्याच्याहून वाईट अभिनय करणारे कित्येकजण तेव्हा बॉक्स ऑफिस गाजवत होते. पण राकेश रोशनच्या कारकीर्दीमध्ये त्याला सर्वात जास्त नुकसान पोचवलं ते त्याच्या दिसण्यानं. गोरागोरा, घारोळा, (आणि लवकर टक्कल पडलेला) हा अभिनेता एकतर  सपोर्टिंग अभिनेता म्हणून किंवा नायिकाप्रधान सिनेमांमध्ये अभिनेता म्हणूनच चालून जात होता. सोलो हीरोच्या फार कमी संधी त्याला मिळाल्या. त्यामुळे त्यानं अभिनयावरचं लक्ष कमी करून निर्माते-दिग्दर्शनात उतरायचं ठरवलं. जे. ओमप्रकाश मेहरासारख्या  यशस्वी निर्मात्याचा या जावयाला सपोर्ट होताच. राकेश रोशननं अतिशय सेफ गेम खेळत नेहमीचेच हिंदी चित्रपटांचे यशस्वी फॉरम्युले थोडेसे ट्वीक करून चांगले मनोरंजकप्रधान सिनेमे दिले. काळाच्या बरोबर चालणार्‍या कथा, तगडी स्टारकास्ट, सुप्रसिद्ध संगीत आणि डोळ्य़ांत न खुपणारी तरीही ग्रेपव्हाईनसारखी पसरत जाणारी मार्केटींग स्ट्रॅटजी ही त्याच्या सिनेमांची काही वैशिष्ट्ये. ज्यावेळी राकेश रोशननं “कहोना प्यार है” करायला घेतला तेव्हा यापैकी एक मुद्दा “तगडी स्टारकास्ट” आपोआप निखळून पडला. त्यातही करीना कपूर बाहेर पडल्यानं त्याच्या सिनेमाचं थोडं नुकसानच झालं. स्वत:च्याच मुलाला लॉंच करताना कथा जास्तीत जास्तरीत्या त्याला फोकस कशी करेल तसंच प्रेक्षकांना ती आपलीशी का वाटेल हे बघणं त्याला भाग होतं. ह्रितिक रोशन लूक्सच्या बाबतीत वडलांवर गेलेला. गोरा तर आहेच, त्याखेरीज सहा फुटाची उंची, अतिशय सडपातळ शरीर, उभट ऍण्गुलर आणि अजिबात भारतीय न वाटणारा चेहरा, घारे डोळे आणि एका हाताला सहा बोटं (हे व्यंग नाही याची कल्पना आहे, पण सिनेमासृष्टीमध्ये कुठली  गोष्ट प्लस होइल आणि कुठली मायनस हे कुणीच प्रेडीक्ट करू शकत नाही). अशावेळी ह्रितिकचं पदार्पण हे सो सोच होइल अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. त्यातही अवघ्या सिनेमासृष्टीचं लक्ष लागलं होतं ते मेगास्टार अमिताभ बच्चनच्या मुलाकडे आणि करिष्माच्या बहिणीकडे. ह्रितिक तसा दुर्लक्षितच होता. इथं लक्षात घ्यायला हवं की त्याला कहोना प्यार है लॉंच होण्याआधी जे सिनेमा ऑफर झाले ते सर्व सहाय्यक अथवा दुय्यम अभिनेत्याचेच होते. मिशन कश्मिर, फिझा आणि यादेंमधले त्याचे रोल मूळ स्क्रिप्टमध्ये फार वेगळे होते. हे सिनेमे त्यानं कहो ना रीलीज व्हायच्या आधी स्विकारलेले. पण कहोना प्यार हैंच्या तुफानी यशानंतर या सिनेमांच्या स्क्रिप्टमध्ये बदल केले. इथं कुणाचं नशीब कशानं पालटेल सांगता येत नाही. पैकी मिशन काश्मिरमध्ये त्याचा रोल स्क्रिप्टला धक्का न लावता इकडे तिकडे पसरवत वाढवण्यात आला. फिझामध्ये एक रोमॅण्टिक ऍंगल देऊन आणि एखाददुसरं गाणं देऊन त्याचा वावर वाढवण्यात आला. यादेंच्या बाबतीत मात्र सुभाष घई पारच फसला. एका बापाची तीन मुलींना वाढवण्याची मूळ कहाणी ह्रितिक करीनाच्या सुपरस्टारपदाला एन्कॅश करण्याच्या नादांत स्क्रिप्ट हवी तशी वाकवत टिपिकल लव्हस्टोरी बनवायला गेला आणि सगळीकडूनच नामुष्की ओढवून बसला. तसं बघायला गेलं तर हाच तो काळ ज्यावेळी “आपल्याकडं स्टार आहेत मग ते कसेही दाखवले तरी फिल्म चालणारच” असल्या अति आत्मविश्वासाला तडा जाण्याचे दिवस चालू झाले. खानत्रयीचा चांगलाच जम बसलेला होता, तरीदेखील नवीन चेहर्‍यांची आवश्यकता जाणवत होतीच. मल्टिप्लेक्सेसचा नुकताच होत असलेला उदय. चांगले कंटेंट ड्रिव्हन सिनेमा बनत असताना मल्टिस्टार्कास्टनी यादरम्यान बराच मार खाला. (मग बिग बजेटवाल्यांनी “डीझायनर फिल्म्स” ही संकल्पना काढली आणि तीच आजही यशस्वीरीत्या चालू आहे). सिंगल स्क्रीनच्या प्रेक्षकांची पसंती लक्शात न घेता केवळ आणि केवळ एन आर आय पब्लिकवर डोळा ठेवून अनेक सिनेमा यादरम्यान निघाले आणि सपाटून आपटले.



ग्लोबल मीडीयाच्या वाढत्या प्रभावानं आपल्याकडं हीरो आणि हीरॉइन यांची जुनी प्रतिमा जाऊन नवीन लूक्सला डीमांड आली होती. पंचवीस वर्षापूर्वी ज्या राकेश रोशनचे लूक्स साजेसे वाटले नव्हते तसेच ह्रितिकचे लूक्स “ग्रीक गॉड” बनून प्रेक्षकांना आवडायला लागले. सलमान खान कृपेने याचदरम्यान बॉडीबिल्डींग हा एक नवीनच पैलू हीरोच्या बायोडेटामध्ये आला होता, आणि सलमाननंतर लगोलग ह्रितिकनं त्याला एन्कॅश करायला सुरूवात केली.  ह्रितीकमॅनिया साथीच्या रोगासारखा देशभरामध्ये पसरला. हा सिनेमा शहरी भागात चालला तसाच नंतर हळूहळू गाण्यांच्या जोरावर ग्रामीण भागातही चालला. ह्रितिक या सिनेमामध्ये नेत्रसुखद होता. स्वत:च्या कमाल आणि किमान मर्यादा ओळखून होता. या सिनेमामध्ये टिपिकल स्टीरीओटाईप रोल्स तेही डबल असताना त्याने दाखवलेली देहबोली.. ह्रितिक उत्तम अभिनेता आहे, पण त्याचा अभिनय केवळ चेहर्‍यावरचा अभिनय नव्हता. दोन पात्रांवरच्या देहबोलीवर, चालण्यावागण्यावर, दिसण्यावर त्यानं घेतलेली मेहनत जाणवत होती. त्यानं स्वत:च्या नृत्यशैलीशी अजिबात फटकून न राहता डान्सस्टेप्स केल्या होत्या आणि या डान्स स्टेप्स आजही आयकॉनिक आहेत. पण त्याच्या या यशाचा आलेख जितक्या जोरात वर गेला तितक्याच जोरात खालीदेखील आला. आप मुझे अच्छे लगने लगे, न तुम जानो ना हम, मै प्रेम कि दिवानी हू, मुझसे दोस्ती करोगे यांसारखे भलीमोठी नावं असलेले आणि सपाटून आपटलेले सिनेमे आल्यावर दुसरं काय होणार? मध्येच येऊन गेलेला “कभी खुशी कभी गमच्या” सुपरहिटपणाचे क्रेडिट घ्यायला शाहरूख आणि अमिताभ हजर होते. ह्रितिककडे आता कहो ना प्यार हैच्या पुण्याईव्यतिरीक्त काहीही नव्हतं. बहुतेक सिनेनिर्माते आता त्याला घेण्यासाठी कचरायला लागले होते. ह्रितिकनं केलेली प्रचंड मोठी चूक म्हणजे कहो ना प्यार है नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळून देखील त्यानं हातातील आधी स्विकारलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्यांना दिलेला नकार. व्यावसायिक स्तरावर त्याचं वागणं योग्य असलं तरी याच सुमार स्क्रिप्ट असलेल्या या चित्रपटांनी त्याच्या करीअरला ग्रहण लावलं. ह्रितिक आता ऑफिशीअली वन फिल्म वंडर म्हणून ओळखला जायला लागला. याचदरम्यान कधीतरी एका प्रसिद्ध सिनेमासिकानं त्याच्यावर एक कव्हर स्टोरी केली “फिनिश्ड!” खरोखर त्याचं करीअर संपायला आलं होतं. एकही सिनेमा हिट नाही, केवळ ऍव्हरेज बॉक्स ऑफिस कलेक्शन. खर्‍या अर्थानं त्याला जाग आली. याआधी त्यानं हातात असलेले प्रोजेक्ट्स भराभर काही न विचार करता घेतले होते. केवळ गूडलूक्स आणि उत्तम डान्सवर सिनेमा चालत नाही हे त्याला जाणवलं असणार. स्क्रिप्टची गरज आणि आपला अभिनय हेच आपल्याला तारून नेणार आहेत हे त्यानं जाणलं. आता मात्र तो चूजी बनला. एकावेळी एकाच प्रोजेक्टवर काम करायचा निर्णय त्यानं घेतला. वडलांसोबत कोइ मिल गयावर त्याचं काम चालूच होतं. हा चित्रपट त्याच्यासाठी मेक ऑर ब्रेक होता.


बडजात्याचा मै प्रेम की दिवानी हूं अगदी आवाजदेखील न करता आपटल्यानं पुढ्च्याच आठवड्यात आलेल्या कोइ मिल गयाबद्दल अख्खी सिनेसृष्टी प्रचंड साशंक होती. एक तर विषय वेगळा होता. “भारतीय प्रेक्षक असा विषय समजून घेईल का?” अशी शंका अनेक लोकांना होती. पण या सिनेमाने त्याला यशाची दारं पुन्हा एकदा उघडी करून दिली. तो वन फिल्म वंडर अथवा सपोर्टींग अभिनेता याहून जास्त काही आहे, याचं हे खणखणीत उदाहरण होतं. बॉलीवूडच्या एका मेन हीरोनं नेहमीचा सरधोपट मार्ग सोडून काहीतरी वेगळं करायची ही पहिलीच वेळ नव्हती. पण बॉलीवूडला इतक्या दिवसांमध्ये प्रेमकथा आनि सूडकथांपासून निवांत मिळत नसल्यानं त्यांनी आजवर सायफाय कथांकडे लक्ष दिलंच नव्हतं. वाढत्या केबलमुळे आणि हॉलीवूड प्रभावामुळे हा जॉनर तरूणांमध्ये किती लोकप्रिय आहे आणि अजून किती लोकांना आवडू शकेल हे राकेश रोशननं बरोबर हेरलं होतं. पूर्ण सिनेमा ह्रितिकभोवती फिरता ठेवण्यात आला होता. सत्यजित रायच्या द एलियन आणि ईटीचा प्रभाव सिनेमावर स्पष्ट दिसत होता. अधूनमधून तोंडी लावायला प्रेमकथा आणि विनोद होते. टेक्नॉलॉजी का कमाल म्हणत छोटा जादू पडद्यावर भावण्यासारखाच होता. पण त्या सर्वांहून जास्त भावून गेला तो ह्रितिकची डोक्यानं अधू असणार्‍या मुलाची भूमिका. त्यानं या भूमिकेसाठी वजन कमी केलं, संवादफेक बदलली, देहबोली बदलली. डोळ्यांचा प्रभावी वापर केला. या सर्वांमधून त्यानं ह्रितिक रोशन द ग्रीक गॉड या सुपरस्टारपदापासून पूर्णपणे फारकत घेतली. प्रेक्षकांनी कोइ मिल गया डोक्यावर घेतला. २००३ चा हायेस्ट ग्रोसर बनला. बॉक्स ऑफिस कलेक्शन वधारलं तसा त्याचा आत्मविश्वासदेखील वाढला.


कोइ मिल गयानंतर ह्रितिकनं प्रत्येक सिनेमा विचारपूर्वक निवडला. तब्बल वर्षभरानं त्याचा लक्ष्य रीलीज झाला.  फरहानबरोबर दिल चाहता है ऑफर होऊनसुद्धा त्यानं नाकारला होता. लक्ष्यच्या वेळी मात्र ही चूक त्यानं केली नाही. लक्ष्यचा विषय तसा घीसापीटा होता, बदल होता तो फरहानच्या ट्रीटमेंटमध्ये. दणदणीत पात्ररचना, काटेकोर प्लॉट आणि चित्रपटामधला ताजेपणा हे फरहानची वैशिष्ट्य. ह्रितिक यामध्ये बेमालूमपणे बसला. सुरूवातीचा बेदरकार, बेफ़िकीर अर्बन युथ जितका बीलीव्हेबल होता तितकाच नंतरचा आर्मीमॅनदेखील. दुर्दैवानं हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. युद्धाची पार्श्वभूमी असूनदेखील देशभक्तीचे कडवे डोस, मेलोड्रामा इत्यादि गोष्टी नसल्यानं असेल, कदाचित. पण ह्रितिक आणि प्रीटी झिंटा यांचं काम मात्र खरंच सुंदर होतं यात वाद नसावा.


यानंतर आला सुपरहीरो क्रिश. क्रिश हा ह्रितिकसाठी टेलरमेड रोल होता. आतापर्यंत कुठल्याही मेगास्टारनं सुपरहीरो करायचा प्रयत्न केलेला नव्हता. (अजूबाला सुपरहीरो कॅटेगरीत टाकावं की नाही ते समजत नाहीये. दारा सिंग जमान्यात काही सुपरहीरो आले, पण क्रिश इतका प्रसिद्ध कोणच नाही.). शिवाय मधूनच काही बी ग्रेड सिनेमा येऊन गेलेत पण ते ढापूगिरी म्हणून. बॉलीवूडचे हीरो एरवीच इतकी सुपरहीरोगिरी करत असतात की वेगळ्या सुपरहीरोची आपल्याला आजवर गरजच भासली नव्हती. पण पुन्हा एकदा राकेश रोशननं खेळलेला जुगार यशस्वी झाला. या क्रिशवर हॉलीवूड सुपरहीरोचा बर्‍यापैकी प्रभाव होता. तरीदेखील अस्सल भारतीय प्रेक्षकांच्या मानसिकतेला ओळखण्याच्या हुशारीनं क्रिश सुपर हिट गेला. या चित्रपटामध्ये उल्लेख करण्याजोगी बाब म्हणजे जादू पूर्णपणे गायब करण्यात आला. परत एकदा सगळा फोकस ह्रितिकवर आणि अख्खा सिनेमा तरून न्यायची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. जी त्यानं समर्थपणे पेलली.


ह्रितिकच्याच याच सुपरहीरो इमेजचा धूम२ ने यथोचित फायदा उठवला. यशराजच्या धूम फ्रेंचायझीमधल्या दुसर्‍या भागात ह्रितिक दिसणार या बातमीनंच सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता वाढवून ठेवली होती. वेगवान प्लॉट, साहसी पाठलागीची दृश्यं, आकर्षक नायिका याबरोबरच धूम सीरीजचा अजून एक प्लस पॉइण्ट होता. व्हिलन हाच हीरो आणि कसलाही भावनिक गोंधळ, बॅकग्राऊड स्टोरी वगैरे काहीही घोळ न घालता एक वेगवान सिनेमा. इथं चोराला कसलीही निगेटीव्ह शेड न वापरता केवळ त्याचं चोर असणं एवढंच महत्त्वाचं होतं. धूम२ मध्ये ह्रितिक छा गया. वेगवेगळे गेटप्स, स्टाईलिश देहबोली, त्याची नेहमीची दिलखेचक नृत्यं आणि सोबत ऐश्वर्या रायबरोबरचा रोमान्स. अभिषेक आणि उदय या सिनेमामध्ये सपोर्टींग ऍक्टर्स म्हणूनच शिल्लक राहीले. ऐश्वर्यासोबत लागोपाठ त्याचा जोधा अकबर आला. चित्रपटाची कथा ऐतिहासिक सत्यापासून पूर्णपणे फारकत घेतलेली होती. तरीदेखील दोन वेगवेगळ्या धर्माच्या राजा-राणीची ही प्रेमकहाणी एखाद्या जादुई परीकथेसारखी प्रेक्षकांना भावली. पृथ्वीराज कपूरनंतर पहिल्यांदाच इतका देखणा मुघल बादशाह सिल्व्हरस्क्रीननं पाहिला असणार. याआधी प्रदीपकुमार आणि झुल्फी सय्यदनं साकारलेले मुघल बादशाह बघून प्रेक्षक धन्य झालेच होते. पण गोवारीकरच्या जोधा अकबरनं मात्र ह्रितिकच्या देखणेपणाला न्याय दिला. याच सिनेमामध्ये उघड्या अंगानं तलवारबाजी करत असलेल्या बादशहाला चोरून बघणार्‍या जोधाचा एक क्लास प्रसंग आहे.


ह्रितिक आता बॉक्स ऑफिसच्या यशापलिकडचा सुपरस्टार झाला  असला तरी त्याचे काईट्स आणि  गुझारिश हे दोन चित्रपट आपटले. या दोन्ही चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांसोबत काहीच नाळ न जोडणं हे यांच्या अपयशामागचं प्रमुख कारण होतं. काईट्स आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून बनवण्यात आला होता. तो विदेशामध्ये चालला तरी भारतीय प्रेक्षकांना मात्र फारसा आवडला नाही. बरेचसे संवाद इंग्रजीमधून असल्यानं हा चित्रपट आपटला, असंदेखील म्हटलं गेलं. गुझारिश हा ह्रितिकसाठी एक माईलस्टोन आहे. क्वाड्राप्लेजिक झालेला जादूगार ही त्याची भूमिका. इच्छामरणाची अपेक्षा व्यक्त करणारा, सगळीकडून हरत येणारा, जीवनाला त्रासलेला तरीदेखील भरभरून जगणारा इथन ही त्याची व्यक्तीरेखा.  याही सिनेमामध्ये त्याची नायिका ऐश्वर्या राय होती. संजय लीला भन्सालीला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. दुर्दैवानं इतक्या सशक्त व्यक्तीरेखा आनि दमदार कथा असूनदेखील सावरीयासारख्याच कृत्रिम नाटकी ट्रीटमेंटनं सिनेमा फारच संथ आणि कंटाळवाणा बनला होता. भन्साली स्वत:च्याच सिनेम्याच्या इतक्या प्रेमात पडलेला असतो की, प्रेक्षकांचा कधी विचारच करत नाही, परिणामी सिनेमा एकसुरी आणि रटाळ होत जातो.


त्यानंतर आला जिंदगी ना मिलेगी दोबारा. झोया अख्तरनं दिल चाहता हैचीच स्टोरीलाईन आणि कॅरेक्टर्स थोडी पुढे वाढवून बनवलेलं हे कॉकटेल प्रेक्षकांना झिंगवणारं होतंच. स्पेनचे एक्झॉटिक लोकेशन्स, छोट्याछोट्या मोमेंट्सनी सजलेली स्क्रिप्ट, फरहान, अभय आणि ह्रितिकच्या तीनही व्यक्तीरेखांना न्याय देण्याची ताकद असलेला अभिनय आणि कतरीनासारखी आयकॅण्डी असताना हा सिनेमा गाजला नसता तरच नवल. जिंनामिदो मधली ह्रितिकची भूमिका पुन्हा एकदा त्याच्याच साच्यामधली होती. या भूमिकेमध्ये अनेक कंगोरे होते. सुरूवातीचा नाराजीनंच ट्रीपवर आलेला, प्रत्येक गोष्ट पैशामध्ये तोलत जाणारा, अधल्यामधल्या वर्षामधल्या कडवट आठवणींचे भार वाहणारा अर्जुन या ट्रीपदरम्यान बदलतो. हळूहळू स्वत:शीच स्वत:ला ओळख करवून देत जातो. डीप सी डायव्हिंगनंतर बॊटीवर बसलेल्या अर्जुनच्या डोळ्यांतून केवळ दोन अश्रू वाहतात. इथं एकही संवाद नाही, मेलोड्रामा नाही. (याबद्दल झोया अख्तरला शतश: धन्यवाद) तरीदेखील संपूर्ण प्रसंग ह्रितिकनं काय ताकदीनं निभावला आहे.


अग्नीपथ हा अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीमधला एक महत्त्वाचा सिनेमा. हा सिनेमा आला तेव्हा अमिताभ बर्‍यापैकी म्हातारा झाला होता. तरीदेखील त्याच्या ऍंग्रीयंगमॅन या इमेजला शोभेल अशा सूडाची कथा असलेला सिनेमा. याचा रिमेक बनवताना करन जोहर आणि करन मल्होत्रानं मूळ कथेमध्ये बरेचसे बदल केले. रौफ लालाचं अफलातून घेतलेलं निगेटीव्ह कॅरेक्टरनं नवीन अग्नीपथ अधिक झळाळून उठला. थंड डोक्याचा, आतून धुमसत असणारा, एकीकडे गुन्हेगारीच्या दलदलीमधून स्वत:चा सूड उगवणारा त्याच वेळी सर्वसामान्य तरूणासारखा प्रेमळ भाऊ, मुलगा आणि प्रियकर असणारा विजय दीनानाथ चौहान म्हणजे शिवधनुष्यच. ह्रितिकनं ते आरामात पेललं. अमिताभच्या संवादफेकीनं अग्नीपथ गाजला होता, आजही त्याचे संवाद खडाखडा म्हणून दाखवणारे फॅन्स आहेत. करण मल्होत्रानं अत्यंत हुशारीनं यामधल्या विजयला शांत दाखवून त्याची संवादफेकच काढून टाकली. त्यामुळे मूळ अग्नीपथ आणि रिमेड अग्नीपथ हे चक्क वेगवेगळे सिनेमा असल्यासारखे आहेत.
यानंतर आलेले ह्रितिकचे दोनही सिनेमा क्रिश ३ आणि बॅंग बॅंग मला व्यक्तिश: आवडले नाहीत. यांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन अतिशय रीमार्केबल आहे, तरीही हे सिनेमा ह्रितिकसाठी फार चांगले नाहीत. यामध्ये त्याचं काम वाईट होतं अशातला भाग नाही. क्रिश ३ स्क्रिप्ट बेसिसवर जबरदस्त गडबडलेला होता. प्लॉट हॉलीवूडवरून इतका ढापलेला असूनदेखील त्यामधलं क्रिशच्या पुतळ्यासमोरचं गाणं वगैरे सर्वच अनावश्यक होतं. वाईट संगीत हा क्रिश३चा अजून एक मायनस पॉइन्ट. क्रिशचा सुपरहीरो खूप अविश्वसनीय वाटला आणि त्याचवेळी प्रेक्षकांपासून पूर्णपणे डीटॅच्ड वाटला. त्याउलट रोहित मेहरा मला जास्त भावला. एका सुपरहीरोचा बाप ही त्याची भूमिकाच अफलातून होती. बॅंग बॅंगवर लेखाच्या सुरूवातीलाच स्तुतीसुमनं उधळलेली आहेत म्हणून परत लिहत नाही. आधीच म्हटलं तसं अता त्याचं वय चेहर्‍यावर दिसतं. १४ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये ह्रितिकनं केवळ १८ सिनेमा केले आहेत. सुरूवातीचे कहोनाप्यार है नंतरचे त्याचे सलग पाच सहा फ्लॉप सोडले तर त्याचं बॉक्स ऑफिस रेकॉर्ड अतिशय चांगलं राहिलं आहे. वेगवेगळ्या भूमिका करायचं साहस त्यानं दाखवलं आहे. थरारक साहसीदृश्यं त्यानं केली आहेत. नृत्याच्या बाबतीत तो आजही फार वेगळा आहे. त्याला टिपिकल इंडियन स्टेप्स शोभत नाहीत, आणि तरीही त्याच्या इतका टेक्निकली परफेक्ट डान्स करणारा हीरो अजून कुठला नाही.



ह्रितिक रोशन हा पूर्णपणे दिग्दर्शकाचा अभिनेता आहे. जेव्हा कधी त्याला उत्तम स्क्रिप्ट आणि योग्य लगाम असलेला दिग्दर्शक मिळालाय तिथं त्याचा अभिनय खुलला आहे.

यापुढे त्याचे अजून चित्रपट येतीलच. शुद्धी आणि मोहेंजो दरो सारखे वेगळे विषय त्यानं करायला घेतले आहेत. वैयक्तिकरीत्या मी मोहेंजोदरोची अधिक वाट पाहीन. त्याच्याकडून अपेक्षा तर चिक्कार आहेत. एकदातरी ह्रितिकला पूर्णपणे खलनायक म्हणून पडद्यावर पहायचे आहे. धूम २ मधला स्टाईलिश चोर वगैरे म्हणून नव्हे, तर कोल्ड ब्लडेड मर्डरर वगैरे टाईपचा खलनायक.


जाता जाता, ह्रितिकचा मला सर्वात जास्त आवडलेला एक प्रसंग.
झोयाच्याच लक बाय चान्समध्ये त्याची भूमिका खूप छोटी होती, पण जितकी होती तितकी त्यानं कमाल निभावली होती. मी आताच हे विधान करून ठेवत आहे की अजून वीस-तीस वर्षांनी लकबायचान्स हा सिनेमा क्लासिक्समध्ये गणला जाईल. एका सुपरस्टारचा किंचित निगेटीव्ह शेड असलेला (या सिनेमामध्ये प्रत्येक पात्राला ती शेड होतीच, कुणीच टू गूड टू बी ट्रू नव्हतं) थोडासा संधीसाधू आणि तरीही जमीनीवर पाय असलेला हा अलि झफर खान त्यानं ताकदीनं साकारला होता. (पुढंमागं या सिनेमावर लिहिणार आहेच तेव्हा डीटेलमध्ये बोलू) एक प्रसंग या सिनेमामधला जिथं झफर चिडून रोमीबद्दल काहीबाही बोलत असतो. अचानक एका आडरस्त्याला त्याची गाडी थांबते. रस्त्यावरची भिकारी पोरं गाडीमध्ये हीरो बसलाय म्हणून धावत येतात. तो झटकन काच वर करतो आणि त्या मुलांशी चेहरा वेडावाकडा करत हसत राहतो. एक वैतागलेला स्वत:च्याच गॉडफादरबद्दल काडीचाही आदर न दाखवत बडबडणारा स्टार ते रस्त्यावरच्या मुलांशी काचेआडून का होइना संवाद साधणारा एक साधासुधा तरूण हा त्याचा या झटक्यातला प्रवास. खास ह्रितिक स्टाईलचा प्रसंग!



ह्रितिकच्या जनरेशनच्या अभिनेत्यांकडे सुदैवाने करण्यासारखे बरेच काही आहे. छाप मोडून टाकायचे असं त्यांनी ठरवलं तर ते त्यांना सहज जमू शकतं. जे खानत्रयीला जमलं नाही, ते  ह्रितिकनं कित्येकदा करून दाखवलंय आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलेलं आहे. दुर्दैवाने हे “वेगळं काहीतरी करणं” सध्या लूक्स, ऍक्शन, फिल्म् पब्लिसिटी यांच्याच इर्दगिर्द फिरत राहतं. सिनेमाच्या मूळ कंटेंटकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. ह्रितिक हा दिग्दर्शकाचा अभिनेता आहे, जेव्हा फरहान किंवा झोयासारख्या दिग्दर्शकांनी त्याच्या शैलीचा वापर केलाय तेव्हा त्याच्यामधील अभिनेता झळाळून  उठलाय. राकेश रोशनसारख्या दिग्दर्शकांनी त्याच्या स्टारडमचा आणि स्क्रीन मॅजिकचा पुरेपूर फायदा उठवला आणि सूरज बडजात्या, सुभाष घईंनी  हाच फायदा  गरजेपेक्षा जास्त उठवून अख्ख्या सिनेमाचीच वाट लावून घेतली.



मला स्वत:ला येत्या काही वर्षांमध्ये ह्रितिककडून खूप अपेक्षा आहेत. खान लोकांची सद्दी अलमोस्ट संपत आलेली आहे. रणबीर कपूर सारखी नवीन मुलं काहीतरी वेगळं करायच्या प्रयत्नांमध्ये आहेत. ह्रितिक कारकीर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथून त्याला वेगळे आणि चॅलेंजिंग भूमिका करता येऊ शकतात. केवळ “कुछ हटके” करना है म्हणून नव्हे तर, मनापासून तो काहीतरी वेगळं करू शकतो म्हणून.

(समाप्त) 

ह्रितिक रोशन!!



नुकताच ह्रितिक रोशनचा रीलीज झालेला बॅंग बॅंग पाहिला. मुळात ज्यावरून सिनेमा ढापलाय (ओके! ऑफिशीअल रिमेक) केलाय त्याच्या कथेमध्ये काडीइतकाही जीव नव्हता. मॉडेलगत कन्फ़्युज फिरणारी कॅमेरून डिआझ, आपण  म्हातारे झालोय हे लपवण्याचा अट्टाहास करणारा टॉम क्रूझ (मला वाटलेलं हा बॉलीवूडचा पेटंटेड फंडा आहे, हॉलीवूडनं कॉपी मारली) आणि प्रचंड गंडलेली कथा यामुळे नाईट ऍण्ड डे सपाटून आपटलेला. दुर्दैवानं हिंदी बॅंग बॅंगनं याच गोष्टी जशाच्या तशा उचलल्या आणि सिनेमा बनवला (रिमेकची गरज काय होती हा वेगळाच मुद्दा). साहसदृश्यं कमालीची चित्रीत झालेली आहेत, एखाद्या हॉलीवूडपटापेक्षाही सरस असे ऍक्शन्स सीन्स या चित्रपटासाठी वापरली होती. पण ते सगळंच एकंदरीत फिकं पडत गेलंय. चित्रपटानं दोनशे करोडचा वगैरे धंदा केल्याच्या बातम्या सर्रास रीलीज झाल्याच्या वीकेंडलाच ऐकू येतात, पण म्हणून तो “चांगला चित्रपट” आहे असं हल्ली म्हणवत नाही. एकेकाळी चित्रपट यशस्वी होणं न होणं हा जुगार होता. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अर्थात चित्रपटांचं अर्थकारण हा पार वेगळा मुद्दा आहे.


बॅंग बॅंगची एकमेव उत्तम बाजू म्हणजे अर्थात कतरीनाचे फ्रेश लूक्स (तिच्या अभिनयाबद्दल बोलण्यासारखं काही असतं तर नक्की लिहिलं असतं) आणि ह्र्तिकचा जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स पण....
प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट म्हणजे त्याच्या चेहर्‍यावर दिसणारं त्याचं वय. चाळीशीला टेकलेला ह्रितिक आताच पंचेचाळीशीचा दिसतोय. सतत काम करत राहणं, चुकीच्या जीवनपद्धती, वैयक्तिक आयुष्यामधले ताणतणाव आणि चित्रीकरणादरम्यान झालेले भयंकर अपघात या सर्वांची गोळाबेरीज त्याच्या देखण्या चेहर्‍यावर हलकीशी होइना का पण जाणवून गेली आणि काळजात चर्र झालं. ह्रितिक रोशन हा आमच्या टीनेजर वयामध्ये आलेला हीरो. मला शाळकरी वयापासून सलमान खान आवडायचा (अजूनही आवडतोच! तो का त्याबद्दल पुन्हा केव्हातरी) पण ह्रितिक “आवडणं” यापलिकडे होता. त्याचे लूक्स, डान्स, स्क्रीनवरचा वावर, त्याचं बोलणं यावर मी तेव्हा फिदा होते, आजही आहे.  २००० च्या दरम्यान अनेक नवीन चेहरे (त्यातही स्टारचिल्ड्रन) पडद्यावर आले, पण त्यापैकी टिकून राहिलेले म्हणजे ह्रितिक, करीना आणि अभिषेक. पैकी अभिषेकनं स्वत:च्या मर्यादा स्वत:च ओळखून त्यानुसार कामं घ्यायला सुरूवात केली. त्यामुळे त्याचे कन्सिस्टंटली सिनेमा येत राहिले पण तो “सुपरस्टार” कधीच बनला नाही, हेही तितकंच खरं. करीनाची करीअर फारच मजेदार आहे. ही ह्रितिकच्याच कहोनाप्यारहै मधून “मला फारसा वाव नाही” असे म्हणत बाहेर पडली (जरी हा निर्णय बबिताचा होता) आणि तिनं रेफ्युजीसारखा अतिशय वेगळा, बॉलीवूडच्या नवीन नायिकेच्या सर्व नियमांचा चोळामोळा करणारा सिनेमा स्विकारला. जेव्हा रेफ़्युजी पाहिला तेव्हा करीना ही कपूर घराण्याची अस्सल वारसदार आहे आणि चित्रपटसृष्टीमध्ये काहीतरी नवीन पायंडा पाडून दाखवेल अशी काहीतरी अपेक्षा वाटली होती. चमेली )())( सारख्या सिनेमांनी या अपेक्षा उंचावल्या. पण मध्येच कधीतरी ती “पू” या इमेजच्या इतक्या प्रेमात पडली की, अक्कलशून्य, सुंदर, मॉडेल दिसणारी वगैरे भूमिका तिला आवडायला लागल्या.. असो, करीनाबद्दल आपण सविस्तर कधीतरी बोलू.



आजचा विषय आहे ह्रितिक. ह्रितिक रोशनचं कहो ना प्यार है मधून पदार्पण हे काही फारसं ब्लॉकबस्टर टाईप होइल वगैरे कुणालाच अपेक्षित नव्हतं. “न्यु किड ऑन द ब्लॉक” इतकीच त्याची ओळख होती. समस्त सिनेसृष्टी त्याच्या आगमनाकडं डोळे लावून बसली आहे, वगैरे चित्र ना पब्लिसिटीमधून रंगवलं ना मीडीयामधून. बहुतेक पब्लिसिटी पाहता हा सिनेमा नायिकाप्रधान असल्याचे चित्र रंगवण्यात आले होते. राकेश रोशन याबाबतीत आधीपासून जीनीयस आहे. स्वत:ला अभिनेता म्हणून सिद्ध करण्यामध्ये जितका कमी पडला होत्या त्याहून अनेक पटीनं त्यानं स्वत:ला दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यानं यापूर्वीच सिद्ध केलं होतं. खरंतर राकेश रोशन “अभिनेता” म्हणून वाईट नव्हता. त्याच्याहून वाईट अभिनय करणारे कित्येकजण तेव्हा बॉक्स ऑफिस गाजवत होते. पण राकेश रोशनच्या कारकीर्दीमध्ये त्याला सर्वात जास्त नुकसान पोचवलं ते त्याच्या दिसण्यानं. गोरागोरा, घारोळा, (आणि लवकर टक्कल पडलेला) हा अभिनेता एकतर  सपोर्टिंग अभिनेता म्हणून किंवा नायिकाप्रधान सिनेमांमध्ये अभिनेता म्हणूनच चालून जात होता. सोलो हीरोच्या फार कमी संधी त्याला मिळाल्या. त्यामुळे त्यानं अभिनयावरचं लक्ष कमी करून निर्माते-दिग्दर्शनात उतरायचं ठरवलं. जे. ओमप्रकाश मेहरासारख्या  यशस्वी निर्मात्याचा या जावयाला सपोर्ट होताच. राकेश रोशननं अतिशय सेफ गेम खेळत नेहमीचेच हिंदी चित्रपटांचे यशस्वी फॉरम्युले थोडेसे ट्वीक करून चांगले मनोरंजकप्रधान सिनेमे दिले. काळाच्या बरोबर चालणार्‍या कथा, तगडी स्टारकास्ट, सुप्रसिद्ध संगीत आणि डोळ्य़ांत न खुपणारी तरीही ग्रेपव्हाईनसारखी पसरत जाणारी मार्केटींग स्ट्रॅटजी ही त्याच्या सिनेमांची काही वैशिष्ट्ये. ज्यावेळी राकेश रोशननं “कहोना प्यार है” करायला घेतला तेव्हा यापैकी एक मुद्दा “तगडी स्टारकास्ट” आपोआप निखळून पडला. त्यातही करीना कपूर बाहेर पडल्यानं त्याच्या सिनेमाचं थोडं नुकसानच झालं. स्वत:च्याच मुलाला लॉंच करताना कथा जास्तीत जास्तरीत्या त्याला फोकस कशी करेल तसंच प्रेक्षकांना ती आपलीशी का वाटेल हे बघणं त्याला भाग होतं. ह्रितिक रोशन लूक्सच्या बाबतीत वडलांवर गेलेला. गोरा तर आहेच, त्याखेरीज सहा फुटाची उंची, अतिशय सडपातळ शरीर, उभट ऍण्गुलर आणि अजिबात भारतीय न वाटणारा चेहरा, घारे डोळे आणि एका हाताला सहा बोटं (हे व्यंग नाही याची कल्पना आहे, पण सिनेमासृष्टीमध्ये कुठली  गोष्ट प्लस होइल आणि कुठली मायनस हे कुणीच प्रेडीक्ट करू शकत नाही). अशावेळी ह्रितिकचं पदार्पण हे सो सोच होइल अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. त्यातही अवघ्या सिनेमासृष्टीचं लक्ष लागलं होतं ते मेगास्टार अमिताभ बच्चनच्या मुलाकडे आणि करिष्माच्या बहिणीकडे. ह्रितिक तसा दुर्लक्षितच होता. इथं लक्षात घ्यायला हवं की त्याला कहोना प्यार है लॉंच होण्याआधी जे सिनेमा ऑफर झाले ते सर्व सहाय्यक अथवा दुय्यम अभिनेत्याचेच होते. मिशन कश्मिर, फिझा आणि यादेंमधले त्याचे रोल मूळ स्क्रिप्टमध्ये फार वेगळे होते. हे सिनेमे त्यानं कहो ना रीलीज व्हायच्या आधी स्विकारलेले. पण कहोना प्यार हैंच्या तुफानी यशानंतर या सिनेमांच्या स्क्रिप्टमध्ये बदल केले. इथं कुणाचं नशीब कशानं पालटेल सांगता येत नाही. पैकी मिशन काश्मिरमध्ये त्याचा रोल स्क्रिप्टला धक्का न लावता इकडे तिकडे पसरवत वाढवण्यात आला. फिझामध्ये एक रोमॅण्टिक ऍंगल देऊन आणि एखाददुसरं गाणं देऊन त्याचा वावर वाढवण्यात आला. यादेंच्या बाबतीत मात्र सुभाष घई पारच फसला. एका बापाची तीन मुलींना वाढवण्याची मूळ कहाणी ह्रितिक करीनाच्या सुपरस्टारपदाला एन्कॅश करण्याच्या नादांत स्क्रिप्ट हवी तशी वाकवत टिपिकल लव्हस्टोरी बनवायला गेला आणि सगळीकडूनच नामुष्की ओढवून बसला. तसं बघायला गेलं तर हाच तो काळ ज्यावेळी “आपल्याकडं स्टार आहेत मग ते कसेही दाखवले तरी फिल्म चालणारच” असल्या अति आत्मविश्वासाला तडा जाण्याचे दिवस चालू झाले. खानत्रयीचा चांगलाच जम बसलेला होता, तरीदेखील नवीन चेहर्‍यांची आवश्यकता जाणवत होतीच. मल्टिप्लेक्सेसचा नुकताच होत असलेला उदय. चांगले कंटेंट ड्रिव्हन सिनेमा बनत असताना मल्टिस्टार्कास्टनी यादरम्यान बराच मार खाला. (मग बिग बजेटवाल्यांनी “डीझायनर फिल्म्स” ही संकल्पना काढली आणि तीच आजही यशस्वीरीत्या चालू आहे). सिंगल स्क्रीनच्या प्रेक्षकांची पसंती लक्शात न घेता केवळ आणि केवळ एन आर आय पब्लिकवर डोळा ठेवून अनेक सिनेमा यादरम्यान निघाले आणि सपाटून आपटले.



ग्लोबल मीडीयाच्या वाढत्या प्रभावानं आपल्याकडं हीरो आणि हीरॉइन यांची जुनी प्रतिमा जाऊन नवीन लूक्सला डीमांड आली होती. पंचवीस वर्षापूर्वी ज्या राकेश रोशनचे लूक्स साजेसे वाटले नव्हते तसेच ह्रितिकचे लूक्स “ग्रीक गॉड” बनून प्रेक्षकांना आवडायला लागले. सलमान खान कृपेने याचदरम्यान बॉडीबिल्डींग हा एक नवीनच पैलू हीरोच्या बायोडेटामध्ये आला होता, आणि सलमाननंतर लगोलग ह्रितिकनं त्याला एन्कॅश करायला सुरूवात केली.  ह्रितीकमॅनिया साथीच्या रोगासारखा देशभरामध्ये पसरला. हा सिनेमा शहरी भागात चालला तसाच नंतर हळूहळू गाण्यांच्या जोरावर ग्रामीण भागातही चालला. ह्रितिक या सिनेमामध्ये नेत्रसुखद होता. स्वत:च्या कमाल आणि किमान मर्यादा ओळखून होता. या सिनेमामध्ये टिपिकल स्टीरीओटाईप रोल्स तेही डबल असताना त्याने दाखवलेली देहबोली.. ह्रितिक उत्तम अभिनेता आहे, पण त्याचा अभिनय केवळ चेहर्‍यावरचा अभिनय नव्हता. दोन पात्रांवरच्या देहबोलीवर, चालण्यावागण्यावर, दिसण्यावर त्यानं घेतलेली मेहनत जाणवत होती. त्यानं स्वत:च्या नृत्यशैलीशी अजिबात फटकून न राहता डान्सस्टेप्स केल्या होत्या आणि या डान्स स्टेप्स आजही आयकॉनिक आहेत. पण त्याच्या या यशाचा आलेख जितक्या जोरात वर गेला तितक्याच जोरात खालीदेखील आला. आप मुझे अच्छे लगने लगे, न तुम जानो ना हम, मै प्रेम कि दिवानी हू, मुझसे दोस्ती करोगे यांसारखे भलीमोठी नावं असलेले आणि सपाटून आपटलेले सिनेमे आल्यावर दुसरं काय होणार? मध्येच येऊन गेलेला “कभी खुशी कभी गमच्या” सुपरहिटपणाचे क्रेडिट घ्यायला शाहरूख आणि अमिताभ हजर होते. ह्रितिककडे आता कहो ना प्यार हैच्या पुण्याईव्यतिरीक्त काहीही नव्हतं. बहुतेक सिनेनिर्माते आता त्याला घेण्यासाठी कचरायला लागले होते. ह्रितिकनं केलेली प्रचंड मोठी चूक म्हणजे कहो ना प्यार है नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळून देखील त्यानं हातातील आधी स्विकारलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्यांना दिलेला नकार. व्यावसायिक स्तरावर त्याचं वागणं योग्य असलं तरी याच सुमार स्क्रिप्ट असलेल्या या चित्रपटांनी त्याच्या करीअरला ग्रहण लावलं. ह्रितिक आता ऑफिशीअली वन फिल्म वंडर म्हणून ओळखला जायला लागला. याचदरम्यान कधीतरी एका प्रसिद्ध सिनेमासिकानं त्याच्यावर एक कव्हर स्टोरी केली “फिनिश्ड!” खरोखर त्याचं करीअर संपायला आलं होतं. एकही सिनेमा हिट नाही, केवळ ऍव्हरेज बॉक्स ऑफिस कलेक्शन. खर्‍या अर्थानं त्याला जाग आली. याआधी त्यानं हातात असलेले प्रोजेक्ट्स भराभर काही न विचार करता घेतले होते. केवळ गूडलूक्स आणि उत्तम डान्सवर सिनेमा चालत नाही हे त्याला जाणवलं असणार. स्क्रिप्टची गरज आणि आपला अभिनय हेच आपल्याला तारून नेणार आहेत हे त्यानं जाणलं. आता मात्र तो चूजी बनला. एकावेळी एकाच प्रोजेक्टवर काम करायचा निर्णय त्यानं घेतला. वडलांसोबत कोइ मिल गयावर त्याचं काम चालूच होतं. हा चित्रपट त्याच्यासाठी मेक ऑर ब्रेक होता.


बडजात्याचा मै प्रेम की दिवानी हूं अगदी आवाजदेखील न करता आपटल्यानं पुढ्च्याच आठवड्यात आलेल्या कोइ मिल गयाबद्दल अख्खी सिनेसृष्टी प्रचंड साशंक होती. एक तर विषय वेगळा होता. “भारतीय प्रेक्षक असा विषय समजून घेईल का?” अशी शंका अनेक लोकांना होती. पण या सिनेमाने त्याला यशाची दारं पुन्हा एकदा उघडी करून दिली. तो वन फिल्म वंडर अथवा सपोर्टींग अभिनेता याहून जास्त काही आहे, याचं हे खणखणीत उदाहरण होतं. बॉलीवूडच्या एका मेन हीरोनं नेहमीचा सरधोपट मार्ग सोडून काहीतरी वेगळं करायची ही पहिलीच वेळ नव्हती. पण बॉलीवूडला इतक्या दिवसांमध्ये प्रेमकथा आनि सूडकथांपासून निवांत मिळत नसल्यानं त्यांनी आजवर सायफाय कथांकडे लक्ष दिलंच नव्हतं. वाढत्या केबलमुळे आणि हॉलीवूड प्रभावामुळे हा जॉनर तरूणांमध्ये किती लोकप्रिय आहे आणि अजून किती लोकांना आवडू शकेल हे राकेश रोशननं बरोबर हेरलं होतं. पूर्ण सिनेमा ह्रितिकभोवती फिरता ठेवण्यात आला होता. सत्यजित रायच्या द एलियन आणि ईटीचा प्रभाव सिनेमावर स्पष्ट दिसत होता. अधूनमधून तोंडी लावायला प्रेमकथा आणि विनोद होते. टेक्नॉलॉजी का कमाल म्हणत छोटा जादू पडद्यावर भावण्यासारखाच होता. पण त्या सर्वांहून जास्त भावून गेला तो ह्रितिकची डोक्यानं अधू असणार्‍या मुलाची भूमिका. त्यानं या भूमिकेसाठी वजन कमी केलं, संवादफेक बदलली, देहबोली बदलली. डोळ्यांचा प्रभावी वापर केला. या सर्वांमधून त्यानं ह्रितिक रोशन द ग्रीक गॉड या सुपरस्टारपदापासून पूर्णपणे फारकत घेतली. प्रेक्षकांनी कोइ मिल गया डोक्यावर घेतला. २००३ चा हायेस्ट ग्रोसर बनला. बॉक्स ऑफिस कलेक्शन वधारलं तसा त्याचा आत्मविश्वासदेखील वाढला.


कोइ मिल गयानंतर ह्रितिकनं प्रत्येक सिनेमा विचारपूर्वक निवडला. तब्बल वर्षभरानं त्याचा लक्ष्य रीलीज झाला.  फरहानबरोबर दिल चाहता है ऑफर होऊनसुद्धा त्यानं नाकारला होता. लक्ष्यच्या वेळी मात्र ही चूक त्यानं केली नाही. लक्ष्यचा विषय तसा घीसापीटा होता, बदल होता तो फरहानच्या ट्रीटमेंटमध्ये. दणदणीत पात्ररचना, काटेकोर प्लॉट आणि चित्रपटामधला ताजेपणा हे फरहानची वैशिष्ट्य. ह्रितिक यामध्ये बेमालूमपणे बसला. सुरूवातीचा बेदरकार, बेफ़िकीर अर्बन युथ जितका बीलीव्हेबल होता तितकाच नंतरचा आर्मीमॅनदेखील. दुर्दैवानं हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. युद्धाची पार्श्वभूमी असूनदेखील देशभक्तीचे कडवे डोस, मेलोड्रामा इत्यादि गोष्टी नसल्यानं असेल, कदाचित. पण ह्रितिक आणि प्रीटी झिंटा यांचं काम मात्र खरंच सुंदर होतं यात वाद नसावा.


यानंतर आला सुपरहीरो क्रिश. क्रिश हा ह्रितिकसाठी टेलरमेड रोल होता. आतापर्यंत कुठल्याही मेगास्टारनं सुपरहीरो करायचा प्रयत्न केलेला नव्हता. (अजूबाला सुपरहीरो कॅटेगरीत टाकावं की नाही ते समजत नाहीये. दारा सिंग जमान्यात काही सुपरहीरो आले, पण क्रिश इतका प्रसिद्ध कोणच नाही.). शिवाय मधूनच काही बी ग्रेड सिनेमा येऊन गेलेत पण ते ढापूगिरी म्हणून. बॉलीवूडचे हीरो एरवीच इतकी सुपरहीरोगिरी करत असतात की वेगळ्या सुपरहीरोची आपल्याला आजवर गरजच भासली नव्हती. पण पुन्हा एकदा राकेश रोशननं खेळलेला जुगार यशस्वी झाला. या क्रिशवर हॉलीवूड सुपरहीरोचा बर्‍यापैकी प्रभाव होता. तरीदेखील अस्सल भारतीय प्रेक्षकांच्या मानसिकतेला ओळखण्याच्या हुशारीनं क्रिश सुपर हिट गेला. या चित्रपटामध्ये उल्लेख करण्याजोगी बाब म्हणजे जादू पूर्णपणे गायब करण्यात आला. परत एकदा सगळा फोकस ह्रितिकवर आणि अख्खा सिनेमा तरून न्यायची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. जी त्यानं समर्थपणे पेलली.


ह्रितिकच्याच याच सुपरहीरो इमेजचा धूम२ ने यथोचित फायदा उठवला. यशराजच्या धूम फ्रेंचायझीमधल्या दुसर्‍या भागात ह्रितिक दिसणार या बातमीनंच सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता वाढवून ठेवली होती. वेगवान प्लॉट, साहसी पाठलागीची दृश्यं, आकर्षक नायिका याबरोबरच धूम सीरीजचा अजून एक प्लस पॉइण्ट होता. व्हिलन हाच हीरो आणि कसलाही भावनिक गोंधळ, बॅकग्राऊड स्टोरी वगैरे काहीही घोळ न घालता एक वेगवान सिनेमा. इथं चोराला कसलीही निगेटीव्ह शेड न वापरता केवळ त्याचं चोर असणं एवढंच महत्त्वाचं होतं. धूम२ मध्ये ह्रितिक छा गया. वेगवेगळे गेटप्स, स्टाईलिश देहबोली, त्याची नेहमीची दिलखेचक नृत्यं आणि सोबत ऐश्वर्या रायबरोबरचा रोमान्स. अभिषेक आणि उदय या सिनेमामध्ये सपोर्टींग ऍक्टर्स म्हणूनच शिल्लक राहीले. ऐश्वर्यासोबत लागोपाठ त्याचा जोधा अकबर आला. चित्रपटाची कथा ऐतिहासिक सत्यापासून पूर्णपणे फारकत घेतलेली होती. तरीदेखील दोन वेगवेगळ्या धर्माच्या राजा-राणीची ही प्रेमकहाणी एखाद्या जादुई परीकथेसारखी प्रेक्षकांना भावली. पृथ्वीराज कपूरनंतर पहिल्यांदाच इतका देखणा मुघल बादशाह सिल्व्हरस्क्रीननं पाहिला असणार. याआधी प्रदीपकुमार आणि झुल्फी सय्यदनं साकारलेले मुघल बादशाह बघून प्रेक्षक धन्य झालेच होते. पण गोवारीकरच्या जोधा अकबरनं मात्र ह्रितिकच्या देखणेपणाला न्याय दिला. याच सिनेमामध्ये उघड्या अंगानं तलवारबाजी करत असलेल्या बादशहाला चोरून बघणार्‍या जोधाचा एक क्लास प्रसंग आहे.


ह्रितिक आता बॉक्स ऑफिसच्या यशापलिकडचा सुपरस्टार झाला  असला तरी त्याचे काईट्स आणि  गुझारिश हे दोन चित्रपट आपटले. या दोन्ही चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांसोबत काहीच नाळ न जोडणं हे यांच्या अपयशामागचं प्रमुख कारण होतं. काईट्स आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून बनवण्यात आला होता. तो विदेशामध्ये चालला तरी भारतीय प्रेक्षकांना मात्र फारसा आवडला नाही. बरेचसे संवाद इंग्रजीमधून असल्यानं हा चित्रपट आपटला, असंदेखील म्हटलं गेलं. गुझारिश हा ह्रितिकसाठी एक माईलस्टोन आहे. क्वाड्राप्लेजिक झालेला जादूगार ही त्याची भूमिका. इच्छामरणाची अपेक्षा व्यक्त करणारा, सगळीकडून हरत येणारा, जीवनाला त्रासलेला तरीदेखील भरभरून जगणारा इथन ही त्याची व्यक्तीरेखा.  याही सिनेमामध्ये त्याची नायिका ऐश्वर्या राय होती. संजय लीला भन्सालीला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. दुर्दैवानं इतक्या सशक्त व्यक्तीरेखा आनि दमदार कथा असूनदेखील सावरीयासारख्याच कृत्रिम नाटकी ट्रीटमेंटनं सिनेमा फारच संथ आणि कंटाळवाणा बनला होता. भन्साली स्वत:च्याच सिनेम्याच्या इतक्या प्रेमात पडलेला असतो की, प्रेक्षकांचा कधी विचारच करत नाही, परिणामी सिनेमा एकसुरी आणि रटाळ होत जातो.


त्यानंतर आला जिंदगी ना मिलेगी दोबारा. झोया अख्तरनं दिल चाहता हैचीच स्टोरीलाईन आणि कॅरेक्टर्स थोडी पुढे वाढवून बनवलेलं हे कॉकटेल प्रेक्षकांना झिंगवणारं होतंच. स्पेनचे एक्झॉटिक लोकेशन्स, छोट्याछोट्या मोमेंट्सनी सजलेली स्क्रिप्ट, फरहान, अभय आणि ह्रितिकच्या तीनही व्यक्तीरेखांना न्याय देण्याची ताकद असलेला अभिनय आणि कतरीनासारखी आयकॅण्डी असताना हा सिनेमा गाजला नसता तरच नवल. जिंनामिदो मधली ह्रितिकची भूमिका पुन्हा एकदा त्याच्याच साच्यामधली होती. या भूमिकेमध्ये अनेक कंगोरे होते. सुरूवातीचा नाराजीनंच ट्रीपवर आलेला, प्रत्येक गोष्ट पैशामध्ये तोलत जाणारा, अधल्यामधल्या वर्षामधल्या कडवट आठवणींचे भार वाहणारा अर्जुन या ट्रीपदरम्यान बदलतो. हळूहळू स्वत:शीच स्वत:ला ओळख करवून देत जातो. डीप सी डायव्हिंगनंतर बॊटीवर बसलेल्या अर्जुनच्या डोळ्यांतून केवळ दोन अश्रू वाहतात. इथं एकही संवाद नाही, मेलोड्रामा नाही. (याबद्दल झोया अख्तरला शतश: धन्यवाद) तरीदेखील संपूर्ण प्रसंग ह्रितिकनं काय ताकदीनं निभावला आहे.


अग्नीपथ हा अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीमधला एक महत्त्वाचा सिनेमा. हा सिनेमा आला तेव्हा अमिताभ बर्‍यापैकी म्हातारा झाला होता. तरीदेखील त्याच्या ऍंग्रीयंगमॅन या इमेजला शोभेल अशा सूडाची कथा असलेला सिनेमा. याचा रिमेक बनवताना करन जोहर आणि करन मल्होत्रानं मूळ कथेमध्ये बरेचसे बदल केले. रौफ लालाचं अफलातून घेतलेलं निगेटीव्ह कॅरेक्टरनं नवीन अग्नीपथ अधिक झळाळून उठला. थंड डोक्याचा, आतून धुमसत असणारा, एकीकडे गुन्हेगारीच्या दलदलीमधून स्वत:चा सूड उगवणारा त्याच वेळी सर्वसामान्य तरूणासारखा प्रेमळ भाऊ, मुलगा आणि प्रियकर असणारा विजय दीनानाथ चौहान म्हणजे शिवधनुष्यच. ह्रितिकनं ते आरामात पेललं. अमिताभच्या संवादफेकीनं अग्नीपथ गाजला होता, आजही त्याचे संवाद खडाखडा म्हणून दाखवणारे फॅन्स आहेत. करण मल्होत्रानं अत्यंत हुशारीनं यामधल्या विजयला शांत दाखवून त्याची संवादफेकच काढून टाकली. त्यामुळे मूळ अग्नीपथ आणि रिमेड अग्नीपथ हे चक्क वेगवेगळे सिनेमा असल्यासारखे आहेत.
यानंतर आलेले ह्रितिकचे दोनही सिनेमा क्रिश ३ आणि बॅंग बॅंग मला व्यक्तिश: आवडले नाहीत. यांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन अतिशय रीमार्केबल आहे, तरीही हे सिनेमा ह्रितिकसाठी फार चांगले नाहीत. यामध्ये त्याचं काम वाईट होतं अशातला भाग नाही. क्रिश ३ स्क्रिप्ट बेसिसवर जबरदस्त गडबडलेला होता. प्लॉट हॉलीवूडवरून इतका ढापलेला असूनदेखील त्यामधलं क्रिशच्या पुतळ्यासमोरचं गाणं वगैरे सर्वच अनावश्यक होतं. वाईट संगीत हा क्रिश३चा अजून एक मायनस पॉइन्ट. क्रिशचा सुपरहीरो खूप अविश्वसनीय वाटला आणि त्याचवेळी प्रेक्षकांपासून पूर्णपणे डीटॅच्ड वाटला. त्याउलट रोहित मेहरा मला जास्त भावला. एका सुपरहीरोचा बाप ही त्याची भूमिकाच अफलातून होती. बॅंग बॅंगवर लेखाच्या सुरूवातीलाच स्तुतीसुमनं उधळलेली आहेत म्हणून परत लिहत नाही. आधीच म्हटलं तसं अता त्याचं वय चेहर्‍यावर दिसतं. १४ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये ह्रितिकनं केवळ १८ सिनेमा केले आहेत. सुरूवातीचे कहोनाप्यार है नंतरचे त्याचे सलग पाच सहा फ्लॉप सोडले तर त्याचं बॉक्स ऑफिस रेकॉर्ड अतिशय चांगलं राहिलं आहे. वेगवेगळ्या भूमिका करायचं साहस त्यानं दाखवलं आहे. थरारक साहसीदृश्यं त्यानं केली आहेत. नृत्याच्या बाबतीत तो आजही फार वेगळा आहे. त्याला टिपिकल इंडियन स्टेप्स शोभत नाहीत, आणि तरीही त्याच्या इतका टेक्निकली परफेक्ट डान्स करणारा हीरो अजून कुठला नाही.



ह्रितिक रोशन हा पूर्णपणे दिग्दर्शकाचा अभिनेता आहे. जेव्हा कधी त्याला उत्तम स्क्रिप्ट आणि योग्य लगाम असलेला दिग्दर्शक मिळालाय तिथं त्याचा अभिनय खुलला आहे.

यापुढे त्याचे अजून चित्रपट येतीलच. शुद्धी आणि मोहेंजो दरो सारखे वेगळे विषय त्यानं करायला घेतले आहेत. वैयक्तिकरीत्या मी मोहेंजोदरोची अधिक वाट पाहीन. त्याच्याकडून अपेक्षा तर चिक्कार आहेत. एकदातरी ह्रितिकला पूर्णपणे खलनायक म्हणून पडद्यावर पहायचे आहे. धूम २ मधला स्टाईलिश चोर वगैरे म्हणून नव्हे, तर कोल्ड ब्लडेड मर्डरर वगैरे टाईपचा खलनायक.


जाता जाता, ह्रितिकचा मला सर्वात जास्त आवडलेला एक प्रसंग.
झोयाच्याच लक बाय चान्समध्ये त्याची भूमिका खूप छोटी होती, पण जितकी होती तितकी त्यानं कमाल निभावली होती. मी आताच हे विधान करून ठेवत आहे की अजून वीस-तीस वर्षांनी लकबायचान्स हा सिनेमा क्लासिक्समध्ये गणला जाईल. एका सुपरस्टारचा किंचित निगेटीव्ह शेड असलेला (या सिनेमामध्ये प्रत्येक पात्राला ती शेड होतीच, कुणीच टू गूड टू बी ट्रू नव्हतं) थोडासा संधीसाधू आणि तरीही जमीनीवर पाय असलेला हा अलि झफर खान त्यानं ताकदीनं साकारला होता. (पुढंमागं या सिनेमावर लिहिणार आहेच तेव्हा डीटेलमध्ये बोलू) एक प्रसंग या सिनेमामधला जिथं झफर चिडून रोमीबद्दल काहीबाही बोलत असतो. अचानक एका आडरस्त्याला त्याची गाडी थांबते. रस्त्यावरची भिकारी पोरं गाडीमध्ये हीरो बसलाय म्हणून धावत येतात. तो झटकन काच वर करतो आणि त्या मुलांशी चेहरा वेडावाकडा करत हसत राहतो. एक वैतागलेला स्वत:च्याच गॉडफादरबद्दल काडीचाही आदर न दाखवत बडबडणारा स्टार ते रस्त्यावरच्या मुलांशी काचेआडून का होइना संवाद साधणारा एक साधासुधा तरूण हा त्याचा या झटक्यातला प्रवास. खास ह्रितिक स्टाईलचा प्रसंग!



ह्रितिकच्या जनरेशनच्या अभिनेत्यांकडे सुदैवाने करण्यासारखे बरेच काही आहे. छाप मोडून टाकायचे असं त्यांनी ठरवलं तर ते त्यांना सहज जमू शकतं. जे खानत्रयीला जमलं नाही, ते  ह्रितिकनं कित्येकदा करून दाखवलंय आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलेलं आहे. दुर्दैवाने हे “वेगळं काहीतरी करणं” सध्या लूक्स, ऍक्शन, फिल्म् पब्लिसिटी यांच्याच इर्दगिर्द फिरत राहतं. सिनेमाच्या मूळ कंटेंटकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. ह्रितिक हा दिग्दर्शकाचा अभिनेता आहे, जेव्हा फरहान किंवा झोयासारख्या दिग्दर्शकांनी त्याच्या शैलीचा वापर केलाय तेव्हा त्याच्यामधील अभिनेता झळाळून  उठलाय. राकेश रोशनसारख्या दिग्दर्शकांनी त्याच्या स्टारडमचा आणि स्क्रीन मॅजिकचा पुरेपूर फायदा उठवला आणि सूरज बडजात्या, सुभाष घईंनी  हाच फायदा  गरजेपेक्षा जास्त उठवून अख्ख्या सिनेमाचीच वाट लावून घेतली.



मला स्वत:ला येत्या काही वर्षांमध्ये ह्रितिककडून खूप अपेक्षा आहेत. खान लोकांची सद्दी अलमोस्ट संपत आलेली आहे. रणबीर कपूर सारखी नवीन मुलं काहीतरी वेगळं करायच्या प्रयत्नांमध्ये आहेत. ह्रितिक कारकीर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथून त्याला वेगळे आणि चॅलेंजिंग भूमिका करता येऊ शकतात. केवळ “कुछ हटके” करना है म्हणून नव्हे तर, मनापासून तो काहीतरी वेगळं करू शकतो म्हणून.

(समाप्त) 

Tuesday 18 November 2014

अब के बरस...










 तशी मी काही फारशी इमोशनल वगैरे व्यक्ती नाही. उगाच कुणीतरी काहीही कारण इक्कुल्या कारणासाठी मला रडू वगैरे येत नाही. क्वचितच रडणार्‍यांचा एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे एकदा रडू आलं की काही केल्या थांबत नाही.... मग आधीचंमागचंपुढचंगेल्यातीनचार वर्षांमधलं जे काय रडणं शिल्लक असतं तो सगळा इमोशनल धबधबा एकदमच सुरू होतो. “टचकन डोळ्यांत पाणीआलं” वगैरे नाहीच. डायरेक्ट जुलै महिन्यातला पाऊसच.

याचा अर्थ मनाचे काही हळवे कोपरे नसतातच असं नाही. असतात ना. पण हे हळवे कोपरे फार सांभाळून ठेवावे लागतात. एकदा का त्यावरची खपली निघाली की जखम सारखी ठुसठुसत राहते. नक्की काय बिनसलंय तेही समजत नाही आणि कशामुळं बिनसलंय तेदेखील. आज पहिल्यांदाच अशा एका हळव्या आठवणीविषयी लिहिणार आहे.

मला स्वत:ला लग्न, पाठवणी आणि त्यानंतरची ती सगळी सासर माहेरची गाणी हे सर्व प्रचंड बोअर होतं. कधीकाळच्या बायकांच्या भावविश्वामध्ये त्याला प्रचंड स्थान असेलही. पण आजच्या काळामध्ये “कारल्याचा वेल लावला सासू बाई आता तरी जाऊ द्या माहेरा” किंवा “अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारतं, अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं” वगैरे “आऊटडेटेड” वाटतं. डिट्टो ते लग्नानंतर भसाभसा रडणार्‍या मुलींबद्दल. आता काही पूर्वीसारखं माहेर अगदीच परकं झालेलं. सासर पूर्णपणे अनोळखी वगैरे असलं काही राहिलं नाही.  मुलीपण आता सुशिक्षित आणि कर्तबगार असतात. अरे ला कारे करायची हिंमत ठेवणार्‍या असतात. तरीही लग्नाअधी वर्षभर अमेरिकेमध्ये नोकरी करून एकट्या राहिलेल्या मुली लग्नाच्या दिवशी मात्र रडतात हे मला कायमच फार चमत्कारिक वाटत राहतं.  


आता माझे याबद्दलचे विचार इतके विखारी आणि जहाल असतानादेखील आशाचं एक गाणं असलं आहे की ते ऐकताना हमखास माझ्या डोळ्यांत पाणी येतं. हे गाणं मी शक्यतो पाहतच नाही, पाहिलं एक अनामिक दडपण यायला लागतं. प्रचंड डिप्रेसिंग वाटायला लागतं... काहीच नाही यार! जगण्यामध्ये असलं काहीतरी वाटायला लावणारं हे गाणं. 

बिमल रॉयचा बंदिनी सिनेमा अफाट आहे. एक स्त्रीप्रधान कथा, त्यातही एका खून केलेल्या स्त्रीची कथा. तिचा संघर्ष, तिच्या वेदना, तिचा लढा आणि तिचा बंदीवास समर्थपणे चित्रित केलेला हा सिनेमा. “मै बंदिनी पिया की, मै संगिनी हूं साजन की” म्हणणार्‍या कल्याणीची ही कथा. जास्त करून हा सिनेमा घडतो जेलमध्ये. म्हणूनच ही एकट्या कल्याणीची कथा नाही.


स्त्रियांच्या या जेलमध्ये सगळाच ड्रामा आहे. स्वभावाचे वेगवेगळे नमुने आहेत. कुणी भांडखोर, कुणी चिडखोर, कुणी हसरं तर कुणी सतत दु:खी. या तुरूंगामधल्या प्रत्येकीला स्वातंत्र्याची आस आहे. उंचच्या उंच भिंतीच्या पलिकडच्या जगामध्ये काय घडतंय ते जाणून घ्यायची इच्छा आहे. पण ते शक्य नाही. इथली प्रत्येक जण ही बंदिनी आहे. इथल्या बंदिवासामधून मुक्त होऊन बाहेरच्या विश्वातही आपल्या नशीबी बंदिवासच आहे हे जाणूनही मुक्तता हवीच आहे.

अशाच एका टळटळीत दुपारी कुणीएक बंदिनी जात्यावर दळत बसली आहे. जात्यावर दळतानाचा आवडता टाईमपास म्हणजे ओव्या वा तत्सम लोकगीतं. आताही एकटीच जात्यावर दळताना तिच्या मुखातून गाण्याच्या ओळी बाहेर पडतात.
“अब के बरस भेज भैय्याको बाबुल सावन ने लीजो बुलाय रे
लौटेंगी जब मेरे बचपन की सखिया दीजो संदेसा भिजाय रे”

दुपारच्या उन्हामध्ये एकटीच जात्यावर कष्टानं हात फिरवत बसलेली ती. जेलमध्ये आहे म्हणजे कसल्यातरी गुन्ह्यामध्ये शिक्षा वगैरे झालेलीच. आता आपल्या पराकोटीच्या दांभिक समाजामध्ये अशा स्त्रीची काय किंमत असणार आहे हे सांगायला हवंच का? तरीही यांत्रिकपणे ती हे जे लोकगीत म्हणतेय ते वडलांना श्रावणामध्ये माहेरी बोलवायलाच. माझ्या लहानपणच्या सगळ्या मैत्रीणी जमतील खेळ खेळतील, तेव्हा मला बोलाव असं विनवणारी ही लेक.

आशाचा आवाज ही एक अत्यंत जीवघेणी चीज आहे हे इथं लगोलग नमूद करून टाकते. लोक जेव्हा तिच्या आवाजाला खेळकर, खोडकर, सेन्सुअस वगैरे लेबलं लावतात तेव्हा त्यांनी ही असली रत्नं ऐकलेली नसणार. या गाण्यामध्ये सुरूवातीपासून शेवटपर्यंत तिचा आवाज असा काही लागलाय... की ज्याचं नाव ते. गोल गोल फिरणार्‍या जात्यासारखा हा आवाज तसाच फिरून तिथंच येत राहतो आणि काळीज कापत राहतो. एसडीची ही चाल बरीचशी लोकगीताच्या चालींजवळ जाणारीच आहे. शैलेंद्रच्या शब्दांमधून प्रसंगामधला सगळा विरोधाभास प्रतीत होतोय. अख्खं गाणं चित्रित करताना बिमलदांनी खूप कमी (अगदी जवळजवळ नाहीच म्हणता येतील) अशा हालचाली असलेल्या फ्रेम्स ठेवल्या आहेत. त्या प्रत्येक फ्रेममधला मोकळेपणा, रखरखीतपणा, एकाकीपणा अंगावर येण्यासारखाच आहे. पडद्यावर हे गाणं जी मुलगी म्हणतेय तिच्या चेहर्‍यावर कसलेही भाव नाहीत (म्हणजे कतरीना कैफचा अभिनय नव्हे!!!) तर अगदीच शुष्क आणि निर्जीव चेहरा घेऊन ती गाणं म्हणतेय. हात एखाद्या यंत्रासारखे जातावर चालत आहेत, ओठांतून गाणं फुटतंय पण त्या सर्वांमध्ये तिथलं कुणीही असून नसल्यासारखंच.

अंबुवा तले फिर से झूले पडेंगे रिमझिम पडेंगी फुहारे
लौटेंगी फिर तेरे आंगन में बाबुल सावन की ठंडी बहारे
छलके नयन मोरा कसके रे जियरा बचपन की जब याद आये रे

कधीतरी असंच रेडिओवर लागलेलं हे गाणं ऐकताना अचानक जाणवलं. जाणवलं म्हणजे काळजाच्या आतपर्यंत घुसलंच. ही बंदिनी म्हणजे केवळ त्या तुरूंगामधली गुन्हेगार नाही. हे गाणं केवळ “सासरी गेलेल्या मुलीला लागलेली माहेरची ओढ” इतकंच नाही. तर कधीतरी आयुष्यामध्ये येऊन गेलेल्या त्या वळणावरचं गाणं. प्रत्येकीच्याच आयुष्यामध्ये थोड्याफार फरकानं हे वळण येतंच. “आता तू लहान राहिली नाहीस” हे ते वळण. आणि याचा संबंध शारीरिक किंवा हार्मोन्सच्या मॅच्युरीटीशी जोडायची कहीही गरज नाही. कुणीच्या आयुष्यात अगदी तीन चार वर्षाची असल्यापासून हे ऐकावं लागतंच की. आपल्या समाजाची एक गंमत असते. पुरूषांनी लहान मुलांसारखं वागलं की त्यांचं फार कौतुक होतं. “आमच्या यांना की नै अजून दर रविवारी क्रिकेट खेळायची हौस असते” “आमच्या बाब्याला अज्जून मीच केलेला चहा लागतो हां” आणि हीच वाक्यं बायांच्या बाबतीत म्हणून बघा... लगेचच व्हॉट्सऍपवर पाठवण्यासारखे ते ढकलविनोद तयार होतील.

बैरन जवानीने छीने खिलौने और मेरी गुडीया चुराई
बाबूल थी मैं तेरे नाजों की पाली फिर क्युं हुयी मै पराई
बीते रे जुग कोइ चिठीया न पाती  ना कोइ नैहर से आये रे

मुलीनं लहान रहायचंच नाही, तिनं मोठं व्हायचं, समजूतदार व्हायचं. अगदी मनाविरूद्ध झालं तरी मन मारून जगायचंच. कितीवेळा हे आपण आजूबाजूला ऐकत असतो? अशावेळी लहानपणच्या त्या मुक्त अनिर्बंध जीवनामधल्या असलेल्या थोड्याफार आठवणी म्हणजेच आयुष्यभराची जपणूक असणार ना? प्रत्येक मुलीला अशीच एक बंदिनी म्हणून तर घडवलं जात असतं. “तू अश्शीच वागली पाहिजेस, तुझे नियम अस्सेच असले पाहिजेत, तुझं चारित्र्य असलंच पाहिजे” एक ना दोन अनेक नियम. तुरूंगात मारूनमुटकून जगायला लावायचं आणि वर त्याच पिंजर्‍यावर तिनं प्रेमही केलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवायची. केवळ समाजाचे नियम सांगतात म्हणून पोटच्या पोरीचा गळा चिरणारा बाप असो वा “आता तुझा या घराशी काहीही संबंध नाही” सांगणारी सख्खी आई असो. रक्ताच्या मायेपेक्षा समाजाच्या या शृंखला अधिक जड ठरतात. मन मानेल तसं जगू देणारी, निर्णयस्वातंत्र देणारी, झाल्याच् चुका तर त्यामधून पुढं येऊ देणारी एक समाजव्यवस्था निर्माण करणं आपल्याला अजूनही शक्य होत नाही? आजही मुलगी असणं म्हणजे आईवडलांच्या मनावरचं दड्पणच का असतं?
प्रत्येक वेळी पडतं घेऊन, प्रत्येक वेळी झुकून दोन पावलं पाठी सरूनच तिनं जगायचं. स्वत:ला जसं हवं तसं न जगता दुसर्‍याच्या नियमाप्रमाणं जगायचं. तुरूंगच असतो की हा सगळा. अख्खं आयुष्य दुसर्‍याच्या जीवावर ढकलायचं. जन्मठेपच....
असो. आज सकाळी हे गाणं टीव्हीवर लागलं आणि बघता बघता आलेले सगळे विचार लिहत सुटलेय. कदाचित काही गोष्टी बदलल्या असतील. माझ्या बाबतीत तरी. मला आयुष्यामध्ये प्रत्येक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळालं होतं हे माझं नशीब. तरी आजूबाजूला बघताना अशा कित्येक बंदिनी आजही दिसतात. त्यांच्या हातापायांतल्या बेड्या आजही खुपतात. त्यांच्या पंखांमधली उडण्याची भरारी आजही जाणवते.


अशा सर्व बंदिनींना त्यांचं स्वातंत्र्य, त्यांची जीवनोत्सुकता नक्कीच मिळायला हवी. हो ना?









Thursday 13 November 2014

दरवाजा (भाग 9)

असिफ त्याच्याकडच्या चावीनं दरवाजा उघडून आत आला. हॉलमधला दिवा लावून हळू आवाजात चालू असलेला टीव्ही बंद केला. माही सोफ्यावर बसल्या बसल्याच झोपलेली होती. टीव्ही बघत असतानाच कधीतरी तिचा डोळा लागलेला असणार. घामानं डबडबलेल्या तिच्या गालांवरून त्यानं हलकेच हात फिरवला, तिची झोप जराशी का होइना पण चाळवलेली बघून लगेच मागे सरकला. तिथंच उभं राहून दोन क्षण तिच्याकडे बघत राहिला.  गेल्या कित्येक दिवसांमध्ये त्यानं पहिल्यांदा तिला इतक्या स्वस्थ निजलेलं पाहिलं होतं. ती परत गाढ झोपलेली बघून त्यानं शॉवर घेतला, किचनमध्ये जाऊन स्वत:चं ताट वाढून तिथंच जेवला, तरी तिला जाग आली नाही. परत तिच्याजवळ आला, तिला दोन्ही हातांवर उचलून नेऊन बेडवर झोपवायचं, पण या अवस्थेमध्ये असं उचलणं सेफ असतं की नाही, या प्रश्नावर त्याची गाडी अडली. शेवटी त्यानं स्वत: झोपायला जायच्या आधी तिला हलकंच जागवलं. “माही, बेडवर झोपतेस का?”


त्याच्या आवाजानं तिची झोप चाळवली. “आलास? किती वाजलेत?” तिनं डोळे चोळत विचारलं. “येऊन अर्धा तास झाला, आणि आता साडेबारा वाजलेत. काही जेवलीस का?” तो तिच्या बाजूला बसत म्हणाला. ती त्याला बिलगून हळूच म्हणाली. “किती उशीर?” 


“झालंच ना, उद्यापासून सुट्टीच...” तिला अजून जवळ घेत तो म्हणाला. 


त्याच्या बोलण्यानं ती व्यवस्थित जागी झाली. त्यासरशी एकदम दूर झाली. तिच्या वागण्यातला हा बदल त्याला जाणवला, “माही, तब्बेत ठिक आहे?” त्यानं परत तितक्याच काळजीनं विचारलं. तिनं काहीही उत्तर दिलं नाही. त्यानं तिच्या केसांतून हात फिरवला. ती अजूनच थोडी मागे सरकली. 


त्यानं उठून त्याच्या तिच्या हातात एक चेक दिला. “डीसूझाचं पेमेंट झालं, बहुतेक सर्व ड्युज क्लीअर झाले. तो आज देत नव्हता, पण मी हटून बसलो. बाऊन्स झालातर कापून काढेन त्याला” 


“बॅंकेत तुलाच टाकावा लागेल. मी घराबाहेर थोडीच जातेय” माही अगदी कोरड्या आवाजात म्हणाली. तिनं चेक घेतला नाही. 


“कमॉन, दरवेळेला देवासमोर वगैरे तूच ठेवतेस ना?” 


“पण तुझा देवावर विश्वास कुठाय? मग कशाला?”


“तुझ्यावर विश्वास आहे, म्हणून.” त्यानं शांतपणं तो चेक परत तिच्या हातात ठेवला. सावकाश उठून ती बेडरूममध्ये आली. “तुला उद्या ऑफिसमध्ये जायचंय का? मी आता रोज ड्रायव्हर म्हणून येऊ शकेन.” तो लगेच तिच्यापाठून येत म्हणाला “आता पूर्णवेळ घरी असेन तर... तुला काही ऑफिसमध्ये मदत..” पण माहीचं त्याच्या बोलण्याकडं लक्ष नव्हतं. “आज रशिदभाईंशी बोललोय. त्यांचा सांताक्रूझमध्ये एक फ़्लॅट रिकामा आहे. थ्री बीएचके आहे, आणि फ़ुल्ली फ़र्निश्ड. तू एकदा येतेस का बघायला?” त्यानं कितीही उसनं अवसान आणून उत्साहानं बोलायचा प्रयत्न केला तरी त्यातला फोलपणा त्यालाच जाणवत होता. आठच दिवसांपूर्वी त्यानं दुसरं घर किमान भाड्यानं का होइना घ्यायचं ठरवलं तेव्हापासून माही त्याच्याशी जास्त बोलत नव्हती. डॉक्टरांच्या मते, माहीनं आता अतिविचार करणं ताण घेणं बंद केलं पाहिजे, पण घडत मात्र त्याच्या उलट होतं. त्यानं कितीही समजावलं तरीही पेच येऊन येऊन परत तिथंच अडत होता. 


बेडवर बसल्याबसल्या तिच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. पुन्हा एकदा गेल्या महिन्याभरातल्या संभाषणांची त्याला आठवण झाली. आता आज तरी परत हा विषय त्याला नको हवा होता. होता होईतो तिला दुखवायचं नव्हतं. “माही, जगातल्या कुठल्या भाषेमध्ये मी तुझी माफी मागू?” तो तिच्या बाजूला बसत म्हणाला. “प्लीज स्वत:ला इतका त्रास करून घेऊ नकोस. माझं चुकलं हे मी मान्य करतो. मी तुला सांगायला हवं होतं. मी त्या दिवशी रागाच्या भरामध्ये.. मी वागायला नको हवं होतं...!” 


माहीनं काही न बोलता फक्त मान फिरवली. ते पाहून तो पुन्हा एकदा हताश झाला. “माही, ऐक ना! ए माही... प्लीज. माझ्याशी बोल” तो हळूच तिला म्हणाला. “मला माझी चूक सुधारायची संधी तर दे. ऐक, आता मी खरं सांगतो. मी आता मोहितला भेटून आलोय. घरी नव्हे, बाहेर कुठंतरी. जे घडलं होतं ती प्रत्येक गोष्ट त्याला सांगितली. त्याचबरोबर त्याचा संसार विस्कटू नये म्हणून समजावलं. त्याला हे सगळं इतकं अचानक आणि अनपेक्षित होतं... तरी मी स्वत: यामध्ये तिची काहीही चूक नाही हे पटवून दिलं. तो तिला माफ करायला तयार झालाय. किंबहुना त्यानं मनातल्या मनात कधीच माफ केलं होतं. आतातरी तू मला माफ कर. माझ्याच्यानं एवढं करणं शक्य होतं, तेवढंच केलं. पण आता जे घडलंय ते विसर ना. आपल्या भविष्यासाठी.. आपल्या दोघांसाठी.. आपल्या बाळासाठी.. प्लीज!”


“कुठलं भविष्य? कसलं भविष्य? मी आजवर जे काही माझं भविष्य समजत होते ते माझं नव्हतंच..” 


“असं तुला का वाटतंय? गेले कित्येक दिवस मी तुला हेच समजवायचा प्रयत्न करतोय. हे असले फालतू विचार करून तू तुझी काय अवस्था करून घेतलीस ते दिसतंय का तुला? तुझ्या तब्बेतीची इतकी हेळसांड, कामामध्ये लक्ष नाही. पंधरा दिवस झाले तू ऑफिसला गेलेली नाहीस. घरामध्ये बसूनबसून निव्वळ हाच एक विचार चालू आहे. काय मिळणार आहे तुला यामध्ये? माही, मला तुला कायम आनंदी बघायचं आहे. हे असं रडलेलं खचलेलं नाही.”


“मी नक्की काय करू? काही घडलंच नाही असं समजून हसत बसू? आय थिंक, हीच माझ्या लाईफची टॅगलाईन असायला हवी ना? काही घडलंच नाही. माही, तुला कधी विकलं गेलंच नाही. माही, तुझ्यावर कधी बलात्कार झालाच नाही. माही, तू कधी वेश्या नव्हतीच. माही, तुला असिफनं कधी विकत घेतलंच नाही. माही, काही घडलंच नाही... हो ना?”


“हे बघ, तो विषय संपलेला आहे. त्यावर आपण कधीच बोलणार नाही. आपण भूतकाळ बदलू शकत नाही...”
“एक्झॅक्टली, असिफ. आपण भूतकाळ बदलू शकत नाही पण तो विसरू शकतो. मी इतके दिवस विसरले होतेच ना? पण जे तू मला सतत सांगत असतोस तीच गोष्ट तू स्वत:बद्दल का नाही करत?”


“मी ऑलरेडी सगळं सोडून आलोय. इतक्या दिवसामध्ये कधीतरी यावर काही बोललोय. ती समोर... अगदी समोरच्या घरामध्ये रहायला असतानासुद्धा एकदादेखील...”


“एकदादेखील तुला मला त्याबद्दल सांगावंसं वाटलं नाही. तुला ती गोष्ट इतकी महत्त्वाची नव्हती. मान्य आहे. किमान मला सांगता आलं नाही.. ठिक आहे. तेही मान्य. तुला काही नसताना मला हे सर्व सांगायला सहा वर्षं लागली होती. आता ती समोरच असल्यावर तुला सांगणं जमलं नाही. तो तुझा स्वभाव नाही. मी ते मान्य करते. पण खरं सांग. तू खर्‍या अर्थानं तिला विसरलास? जमलं तुला?” 


असिफ उठला. “झोप आता, खूप उशीर झालाय. आपण दोघं या विषयावरती कितीही बोललो तरी तिढा सुटणार नाही. ती काय चीज आहे... साला तिची सावली पडली तरी मी बरबाद होतोय. एवढ्या लांब येऊन, आज काहीही गरज नसताना इतक्या वर्षानंतर तुझ्या आणि माझ्या नात्यामध्ये... तिच्यामुळं दुरावा आलाय..”


“दुरावा तिच्यामुळं आलेला नाही.. तुझ्या कडवटपणानं आलाय. जर तुझ्यासाठी ती इतकी महत्त्वाचीच नव्हती, तर मला तेव्हाच सांगायचं होतंस. माही, समोर राहते ती रेश्मा. एवढे तीन चार शब्द बोलला असतास तर कदाचित मी हसले असते, तुला त्यावरून चिडवलं असतं किंवा तो विषय पूर्ण बंद केला असता. तिच्याशी अजिबात बोलले नसते... काय केलं अस्तं ते माहित नाही, पण हे तू केलं नाहीस. आणि जेव्हा तुला तिचा राग आला तेव्हा तू राग तिच्यावर काढलास. कुठल्या हक्कानं.  म्हणून मला वाईट वाटतंय? आज जे काही सहन करतेय...”


“मी खोटं बोललो, मी लपवलं तर त्यात तू का सहन करतेस तेच मला समजत नाही” असिफ एकदम आवाज चढवत म्हणाला, “काय खुपतंय तुला? सांग एकदा. मी कसलाही आरोप ऐकून घेईन. तू देशील ती शिक्षा भोगेन.. पण तिच्यामुळं माझं आयुष्य परत एकदा नासवणार नाही. तिच्यामुळं तू दूर गेलेली मला चालणार नाही. मला आधीची माही परत हवी. माझ्याशी भांडणारी, माझ्यावर वैतागणारी... माझी माही. मला हे असं तुझं दूरदूर राहणं झेपत नाही. सांग एकदा. आज काय तो सोक्षमोक्ष लावून टाकूया. काय खुपतंय तुला?”


“असिफ, मला एकच खुपतय...  यु आर स्टिल मॅरीड टू हर.” माही एक एक शब्द स्पष्टपणे उच्चारत म्हणाली. 
ते ऐकताच त्याच्या चेहर्‍यावर परत एकद संताप दाटून आला. “काहीही बोलू नकोस.... त्या गोष्टीला पंधरापेक्षा जास्त वर्षं होऊन गेलीत...”


“तरीही.. तरीही... असिफ, हेच सत्य आहे. कधीतरी स्वत:शी कबूल कर. तू आणि मी लग्नाच्या विषयावरून कितीतरी वेळा वाद घातलेत. तेव्हा तू एकदा मला म्हणाला होतास, की जेव्हा तुमच्या मनाच्या प्रतलावरचा सगळ्यांत मोठा भाग एकाच व्यक्तीच्या विचारांनी व्यापला जातो तेव्हाच खरंतर तुमचं लग्न होतं. कारण ती व्यक्ती तुमच्यासाठी तितकी महत्त्वाची असते”


“तिच्याबद्दल माझ्या मनात काहीही नाही.”


“कसं काहीही नाही? हा प्रचंड मोठा तिरस्कार आहे. संताप आहे. घृणा आहे. असिफ तुझ्या मनाचा इतका मोठा भाग तिनं व्यापून ठेवलाय, की माझ्यासाठी तिथं जागाच नाही. मी इथं एकटीच आहे. मी काय आहे तुझ्यासाठी? तुझी सोय? तुझी सवय? तुझी स्वप्नं पूर्ण करणारं मशिन?मी तुझ्या आयुष्यात आहे पण तुझ्या मनात मी कुठं आहे?”
“माही, तू माझी लाईफ पार्टनर आहेस, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तुझ्याशिवाय मी आजवर कधीही कुणाचाही विचारसुद्धा केलेला नाही.”


“परत तेच खोटं! सतत असिफ सतत!!! सतत तिचा विचार असतो. जितकं प्रेम तू माझयवर करतोस त्याहून जास्त तिचा द्वेष करतोस. आणि ते मला खुपतंय. तुझ्या आयुष्यामध्ये तिचा विचारदेखील असणं मला खुपतंय. वास्तविक आज तुझ्याइतका यशस्वी माणूस दुसरा नसेल. फिल्म इंडस्ट्रीमधल्या जेन्युइन लोकांची यादी काढली तर त्यात तुझं नाव हमखास येईल. ज्या मुलाकडं एकेकाळी शाळेचं दप्तर आणायला पैसे नव्हते, जो मधल्या सुट्टीमध्ये घरी येऊन जेवायचा कारण त्याच्याकडे एक डबा नव्हता, आज तो असिफशेखर करोडोंची कामं करतोय. हे सगळं त्यानं त्याच्या कर्तृत्त्वावर मिळवलेलं यश आहे. तरीही तू खुश आहेस का? तर नाही. सतत स्वत:ला कसल्यातरी न्युनगंडामध्ये अड्कवून ठेवलं आहेस. मी इथं असायला नको हवा होतो, पण तिच्यामुळं मी आज इथं आलोय. माझ्या प्रत्येक अपयशाला ती जबाबदार आहे हा जप मनामध्ये सतत चालू असतो. तुझ्या यशाचं मोजमाप कधी केलंस? तू स्वत:च्या एकातरी अचिव्हमेंटवर खुश असतोस? इतक्या दिवसांमध्ये कधीतरी “हे मी कमावलं” याचा तुला अभिमान वाटलाय? जितका अभिमान तुला माझ्या शिक्षणाचा वाटतो, माझ्या कामाचा वाटतो तितका तुला स्वत:चा वाटलाय?”


“हा काही प्रश्न आहे का? तू माझ्यापेक्षा जास्त शिकलेली...”


“नाही! “मी” त्यात नाही. वयाच्या १९व्या वर्षी जेव्हा तू मला घेऊन त्या हॉस्टेलमध्ये गेलास, माझी कॉलेज ऍडमिशन केलीस तेव्हा मला इतकी अक्कल आली होती, की इतके दिवस आपलं शरीर विकलं जात होतं. आजपासून आपलं भविष्य विकलं जाणार आहे हे मी तेव्हाच समजून गेले. मी तुझ्यासाठी फक्त एक साधन होते. खूप शिकायचं, प्रतिष्ठित नोकरी मिळवायचं तुझं स्वप्न पूर्ण करणारं. तू जेसिकासाठी काही केलं नाहीस, केलंस ते तुझ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी..”


आपण काय ऐकतोय त्यावर असिफचा विश्वास बसेना. इतके दिवस माहीच्या मनातच हे सर्व होतं, की आता तिला हे प्रश्न पडतायत? “मला ते सर्व मान्य आहे. त्यावेळी मला लागलेली रूखरूख दूर करण्यासाठी मी सर्व केलं. पाण्यासारखा पैसा कमावूनसुद्धा समाधान वाटलंच नाही, जितकं समाधान तुझ्या प्रत्येक सेमीस्टरची मार्कलिस्ट हातात आल्यावर वाटलं. पैशानं प्रत्येक गोष्ट तोलता येत नाही, पण  पैशांनी स्वप्नं पूर्ण करता येतात. पण् माझं फक्त  तेच स्व्प्न नव्हतं. जर मी माझ्या लग्नाचं खोटं सर्टिफिकेट बनवून आणू शकत होतो, तर माझ्यासाठी शिक्षणाची वाट्टेल ती सर्टीफिकेट्स बनवता आली असती. मी ते केलं नाही. त्याऐवजी माझं स्वप्न तुझ्यामार्फत पूर्ण केलं, कदाचित माझं तेही वागणं चुकलं असेल. त्याक्षणी त्यावेळेल मला तेवढंच सुचलं. तेव्हा तुझं आणि माझं काय नातं होतं हे मला माहित नव्हतं, विचारही केला नाही. आई गेली, आणि खर्‍या अर्थानं अनाथ झालो तेव्हा तू माझ्यासोबत होतीस.. माही, सोबत चालताना तू माझा आधार बनलीस. कसाही वेड्यासारखा या दुनियेत हरवून गेलो असतो. मला कशाचीच फिकीर नव्हती, काळजी नव्हती... वाहवत गेलो असतो तर स्वत:लासुद्धा सापडलो नसतो. तू माझे पाय घट्ट जमिनीवर बांधून ठेवलेस. माझ्या वेड्यावाकड्या आयुष्यामध्ये तू शिस्त आणलीस. आज मी जे काही आहे, ते तुझ्यामुळे आणि म्हणूनच मला कायम तुझा अभिमान वाटत आलाय. माझं प्रत्येक अपयश माझी कमाई आहे, पण माझं प्रत्येक यश हे तुझ्या सोबतीमुळं शक्य झालंय. तुझं आणि माझं नातं मला स्वत:ला अजून समजलेलं नाही. पण त्या नात्याशिवाय माझं अस्तित्व नाही, हे मात्र खरं. आपण दोघांनीही भूतकाळ विसरायचं ठरवलं होतं ना? मग तरीही परत तेच का उगाळतोय? काय मिळणार यातून?”


“मी परत काहीही उगाळत नाहीये. उलट इतके दिवस सगळं काही विसरून गेले होते. जगाला जे खोटं सांगितलं होतं, की आम्ही सहज भेटलो आणि एकमेकांच्या प्रेमात पडलो. त्या खोट्यालाच खरं मानायला लागले होते. या तुझ्या असल्या रानटी वागण्यानं पुन्हा एकदा मनामधल्या जखमा ताज्या झाल्यात. असिफ इतका तिरस्कार कशासाठी? इतके दिवस ज्या गोष्टींचा विचार केलेलाच नव्हता, तो आता करतेय. कदाचित मी कृतघ्न असेन, पण मी माझ्या विचारांशी फारकत घेऊ शकत नाहीये. पहिल्यांदा असिफ, पहिल्यांदा हा प्रश्न विचारतेय. माझं तुझ्यावर प्रेम आहे का?” 


“ते मी कसं सांगणार? तुझं तुला माहित नाही?” त्यानं चिडून विचारलं. 



“तूच सांगायला हवंस, तू माझा मालक आहेस. सगळ्याच अर्थांनी” 


असिफनं पुढं येऊन माहीच्या डोळ्यांमधलं पाणी पुसलं. “असलं बोलत जाऊ नकोस. मी आजवर तसं कधीही मानलेलं नाही. पहिल्या दिवसापासून सांगतोय.” त्याचा आवाज प्रचंड दुखावलेला होता. इतक्या वेळाचा त्याचा संताप निघून गेला होता, त्याऐवजी याक्षणी त्याला काय वाटत होतं तेच त्याला समजेना. 


“म्हणजे, तुझा माझ्यावर काही अधिकार आहे की नाही?” माहीनं तिच्या चेहर्‍यावरचा त्याचा हात दूर करत विचारलं. 


“अधिकार? कसला अधिकार? माही, तू मला जर शब्दांत अडकवणार असशील तर तू जिंकलीस. मला नाही जमत. पण मला काही गोष्टी पक्क्या माहित आहेत. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं आयुष्य जगायला तू स्वतंत्र आहेस. उद्या जर तू उठून म्हणालीस, की मी तुला सोडून जाते. तर मी तुला अडवेन. हमखास, पण माझं प्रेम आहे म्हणून. अधिकार आहे म्हणून नव्हे!”


“उद्या जर मी काही चुकीचं वागले, तुला हर्ट केलं तर... हाच अधिकार म्हणून मला मारशील? लाथा घालशील?” 
“परत तेच. रागाच्या भरात वागलो होतो. चुकलं, त्यासाठी तिनं किंवा तिच्या नवर्‍यानं पोलिस तक्रार केली असती तर मी जेलमध्येसुद्धा गेलो असतो. तिची माफी मागितली, तुझी मागितली. तिचा संसार मोडू नये म्हणून आज माझ्या मनाविरूद्ध जाऊन प्रयत्न केलेत. पण तुझ्या तोंडून असे प्रश्न का येतात? कसं समजावू? तू तिला माफ केलंस, मग मला का नाही? तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही मला माहित नाही पण गेली इतकी वर्षे माझ्यासोबत आहेस... तेव्हा कधीतरी तुला हा प्रश्न पडला? कधीतरी माझं वागणं वावगं वाटलं नाही... मग आजच का?”


“कारण, तेव्हा मी तुला देवघरामध्ये बसवून ओवाळत होते. तुझ्या उपकारांच्या कृतद्न्यतेसाठी स्वत:ला झिजवत होते. पण आता मला त्या चांगल्या असिफच्या चेहर्‍यामागचा हा दाहक चेहरा दिसतोय. आणि मी त्याला घाबरतेय. माझा असिफ मनामध्ये इतकं विष ठेवून माझ्यासोबत जगत होता या विचारानं मी अस्वस्थ होतेय. तुझ्यासारखा माणूस माझ्या नशीबात आला हे माझं भाग्य. तुझे ते उपकार मी कधीही विसरणार नाही. पण या माणसावर मी प्रेम करते का? इतक्या वर्षांपूर्वी  निमिषाचाही अवधी न घेता हो म्हटलं अस्तं. पण आज त्याचं उत्तर नकारार्थी येतंय असिफ. ज्या माणसाच्या मनामध्ये कुणाहीबद्दल इतका पराकोटीचा राग असेल, संताप असेल त्या माणसावर मी कसं प्रेम करू शकते. अशा माणसानं माझ्यावर कितीही प्रेम केलं तरी त्याला काय अर्थ आहे... तो माणूस खर्‍या अर्थानं कधीच कुणावर प्रेम करू शकत नाही. ती भावनाच तो समजून घेऊ शकत नाही. मग आज माझ्या मनात तुझ्याबद्दल जे आहे ते प्रेम आहे की अजून काही? मी तुझ्या लपवून ठेवल्यानं दुखावले नाही. मी घरात नसताना जर तुझे आणि तिचे कसलेही शारीरिक, भावनिक संबंध आले तरीही इतकी दुखावले नसते, जितकी तुझ्या वागण्यानं दुखावली आहे.”



“पण मी माफी मागितली आहे ना? अजून काय करू?”


“माफी मागू नकोस!! आता माफ कर. तिला. तिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीला. तुझ्या भूतकाळाला. त्या भूतकाळामधल्या असिफला. आपला दोघांचाही भूतकाळ फार वाईट आहे. पण तो घडून गेलाय, इट्स गॉन. आता त्यावर कुढत बसण्यानं.. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्येचं खापर तिच्यावर फोडल्यानं काहीही हाती लागणार नाही. फक्त माती मिळेल.”


“हे सगळं झालंय. जसं मी तुला सांगितलंय, तसंच मी प्रत्येक गोष्ट विसरलो होतो. इथं रहायला येईपर्यंत... इथं ती समोर आल्यावर.. पहिल्याच दिवशी मला तिला पाहताच इतका संताप आला होता. माझं जीवन बरबाद करून ती सुखात आहे..पण तो भूतकाळ होता, मी त्याकडे कधीच लक्ष दिलं नाही..”


“थांब, तुझं जीवन बरबाद करून? काय बरबाद झालास? आयुष्यात यशस्वी नाहीस का? हो. गेला काही काळ कष्टाचा गेला पण मांजरीला जसं कुठूनही फेकलं तरी ते आपल्या चार पायांवर उभं राहतंच तसं परिस्थितीनं आपल्याला कितीही फेकलं असलं तरी आपण परत उभेच राहिलोय ना? असिफ काय काय आपण सहन करत आलोय? माझ्या कामामध्ये, तुझ्या बिझनेसमध्ये कमी का टक्केटोणपे खाल्ले, जगलोच ना आपण. कदाचित एकेकाळी पाहिलेली स्वप्नं तू पूर्ण केली नसशील. कुणाची होतात? मी शाळेत असताना मला वाटायचं डॉक्टर व्हावं, गावामधेच एक चार पाच बेडचं हॉस्पिटल चालवावं, आमच्या गावात नव्हतं. पण ते शक्य झालं नाही. वेगळंच शिकले. कधी विचार पण केला नव्ह्ता अशा क्षेत्रात आले. मधली चार पाच वर्षं मरणप्राय वेदना भोगत नरकामध्ये खितपत पडले. पण तिथून बाहेरही आले. पुढे आज यशस्वी झालेच. काय बिघडलं? हाच विचार तू तुझ्याबाबतीत का करू शकत नाहीस? तुला इंजीनीअर व्हायचं होतं, त्याऐवजी सेट डीझायनर झालास. पण काम मनासारखं करतो आहेस ना? कुणाला लबाड्या करून कसली बेकायदेशीर कामं करून तर जगत नाही. कुणाच्या फेकलेल्या तुकड्यांकडे लाचारीनं बघत नाहीस.... मग तुला तुझ्याच या जगण्याचा इतका तिटकारा का आहे? प्रत्येक वेळेला स्वत:ला इतकं खालच्या दर्जाचं का समजतोस?”


“माही, माझ्या लहानपणी...”


“खड्ड्यात गेलं ते लहानपण.” माही त्वेषानं ओरडली. इतक्या दिवसांत पहिल्यांदा त्यानं तिचा इतका संतापी आवाज ऐकला होता. “फार कौतुकं झाली. कष्टात गेलं. वडील नव्ह्ते. आईची काळजी होती. गावामध्ये दहशत होती. पण ते संपलंय. इट्स ओव्हर. आता त्यातून बाहेर ये. तिला विसर. तिला माफ कर. बी अ बिगर मॅन आणि पुढे चालत ये. ज्या क्षणी तुझ्या मनामधून हा सगळा विखारीपणा बाहेर पडेल ना... त्या दिवशी तुला जाणवेल की तुझं आयुष्य किती सुंदर आहे”


“माही, तू माझ्या आयुष्यात आहेच तर हे सुंदरच आहे. पण तिला माफ करणं एवढं सोपं नाहीये”


“माफ करणं किती कठीण आहे किती सोपं आहे ते मला सांगू नकोस. माझ्या सावत्र आईनं मला पैशांसाठी विकलं होतं. त्याच बाईच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी मी लाखो रूपये खर्च करतेय. कशासाठी मी तिला माफ केलं? ज्या दिवशी माझ्या आयुष्यात असिफ शेखर आला, मला नको असलेल्या त्या नरकातून मला बाहेर घेऊन आला. ज्या दिवशी त्यानं माझा हात पकडून मला तू माझी लाईफ पार्टनर आहेस हे सांगितलं त्या दिवशी मी तिला माफ केलं. कारण ज्या गोष्टीसाठी माझा तिच्यावर राग होता, ते कारणच माझ्या आयुष्यातून निघून गेलं होतं. मग मी माझ्या मनामध्ये तिच्याविषयी घाण का ठेवू?”


“प्रत्येकालाच शक्य होतं असं नाही. तुझ्याइतकं माझं निर्मळ मन कधीच होणं शक्य नाही... पण तरीही... मी प्रयत्न करेन”


“नाही, गेली पंधरा वर्षं प्रयत्नच करतोस. आज मला तुझ्या नजरेमधला हा शिळेपणा, हा विषारीपणा निघून गेलेला बघायचाय. कधीतरी एकदा तिच्या नजरेकडे बघ. किती शांत आणि समाधानी आहे. तिचंही चुकलं ती खोटं बोलली. तुझ्याशीच नव्हे तर नवर्‍याशी, माझ्याशी, किंबहुना प्रत्येकाशीच. तरीही ती कायम स्वत:शी प्रामाणिक आहे. स्वत:च्या भावनांशी प्रामाणिक आहे. अजूनही तुझी आसक्ती आहे, हे तिला माहित आहे. त्याचवेळेला तिला तू कितीही हवा झालास तरीही तिचं पाऊल वाकडं पडणारच नाही याची तिला खात्री आहे. नवर्‍याशी खोटं बोलली म्हणून वाईट वाटतंय, पण सत्य सांगायची आपल्यात हिंमत नव्हती हेही तिला माहित आहे. तिच्याइतका नाही, पण थोडातरी स्वत:शी प्रामाणिक हो. तिच्याबद्दल मनातल्या पराकोटीच्या भावना आहेत.. ते स्वत:शी कबूल कर. मला जेव्हा तिनं सांगितलं ना, की माझ्या मनामध्ये असिफ कायम असतो... मी प्रत्येक क्षणी  त्याचा विचार करते, तेव्हा मला बिल्कुल आश्चर्य वाटलं नाही. उलट एक गोष्ट तीव्रतेनं जाणवली, गेली सतरा अठरावर्शं असिफ पण तेच करतोय. फरक इतकाच की तिनं भूतकाळाला प्रेम समजून मिठी मारली आहे, आणि तू भूतकाळाशी दुष्मनी घेऊन बसला आहेस.”  


“माही, प्लीज विषय बास. मला आता यावर काही बोलायचं नाही. स्पष्ट सांगतो, मी तिला माफ करू शकत नाही. करणारही नाही. ती तुझ्याशी कितीही चांगली वागली तरीही.. माझ्या मनात तिच्याबद्दल काहीही असलं तरी त्यानं तुला फरक पडू देऊ नकोस. मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तू माझ्यासोबत हवीस. आपलं एकत्र असणं हवंय. मला आपल्या बाळासाठी आई आणि वडील दोघंही हवेत. प्लीज, माझ्यावर तेवढे उपकार कर.” 

एवढं बोलून तो उठून हॉलमध्ये निघून गेला. टेबलावर ठेवलेलं कसलंसं पुस्तक उघडून बसला. ते पुस्तक मराठी आहे की तमिळ हेसुद्धा त्याच्या डोक्यांत शिरत नव्हतं, तरी त्या पांढर्‍यावर उमटलेल्या काळ्या अक्षरांकडे बघत राहिला. शी हॅज डन इट अगेन, तो स्वत:शीच पुटपुटला. अगदी विनासायासपणे काहीही न चुकता तिनं एकाच क्षणामध्ये त्याचं भावविश्व परत उधळून लावलं होतं. इतके दिवस त्यानं माहीसोबतचं नातं नाजुकपणे जपलं होतं.. या नात्याला कुणीही समजून घेणं शक्यच नव्हतं. त्यानं अपेक्षाही केली नव्हती, सुरूवातीला प्रत्येक जण हसला होता, मस्करी उडवली होती. पहिल्यांदा रशीदभाईला तिला घरी घेऊन यायचा निर्णय सांगितला तेव्हा तो कितीतरी चिडला होता. “पैर की जूती पैर मे, सर की टोपी सरपे” तीनतीनदा हेच सांगत राहिला. तसंही त्याच्या मनात कित्येक दिवसापासून असिफला जावई करून घ्यायचं होतंच. पण असिफ त्याच्या निर्णयावर ठाम राहिला. नंतर खूप वर्षांनी माहीला भेटल्यावर रशीदभाई खुश झाला. हीच ती पैर की जूती हेसुद्धा तो विसरून गेला. पुढं माहीनं आयटी सर्व्हिसचं ऑफिस टाकलं तेव्हा स्वत: हून आर्थिक मदतीला तयार झाला. ओळखीच्या प्रत्येकाला असिफ आणि माही एकमेकांसाठी किती योग्य आहेत हे सांगत राहिला. त्या दिवशी पार्टीमध्ये जेसिकासोबत वाट्टेल ते करणारे लोकंच नंतर तिला “भाभीजी” म्हणून आदर द्यायला लागले. पाठीमागून अश्लील कमेंट्स मारत असतील, पण असिफसमोर कधीच नाही. या लोकांना त्याच्या मनातल्या भावनेची कदर होती, ती कदर जी या समोरच्या बाईकडून कधीच झाली नाही. वर्षभर खपून एखादं चित्र रंगवावं आणि कुणीतरी ते कात्रीनं टराटरा फाडून टाकावं, तसंच हेसुद्धा. त्यानं इतक्या नेटानं जपलेलं त्याचं नातं असं कणाकणाला दूर जाताना दिसत होतं. 

त्यानं प्रत्येक वेळी माहीच्या भावनांचा विचार केला होता, तिला सोबत रहायला विचारलं तेव्हाही “तुला यायचं असेल तर...” हे सांगूनच. ती नाही म्हणाली असती तर तसंच मागे फिरून तिच्या आयुष्यामधून कायमचा बाहेर पडला असता, पण ती सोबत आली. नुसतीच आली नाहीतर त्याच्या हातात हात देऊन चालत राहिली. कुठल्या शब्दांमध्ये तो हे नातं तोलू शकणार होता. माहीच्या हुशारीचा, तिच्या मेहनतीचा, तिनं आजवर मिळवलेल्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान तो तिलाच कसा समजावणार होता? माहीनं आज केवळ त्याला “माझं तुझ्यावर प्रेम आहे का?” या गोष्टीला नकारार्थी  उत्तर येतंय एवढंच सांगितलं नव्हतं, कुठंतरी त्याच्या जगण्याच्या आशेची दोर कापली होती. 
त्याच्या मनामध्ये कामाविषयी, त्याच्या सामाजिक दर्जाविषयी न्यूनगंड कधीच नव्हता. होता तर तो केवळ एक प्रश्न. कशासाठी? आपण एवढं सगळं कशासाठी करतोय? जगण्यसाठी त्याला इतक्या पैशांची गरज नव्हती. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी इतकं धावायची गरज नव्ह्ती. तरीही हे सगळं आपण कशासाठी केलं? माहीसाठी! केवळ तिच्यासाठी. 


अचानक त्याला आपण खूप दमलोय, थकलोय असं वाटायला लागलं. हातातलं पुस्तक धरण्याइतकं पण त्राण राहिलं नाही, पुस्तक पडल्यावर त्यानं टेबलावर डोकं ठेवलं. नजरेसमोर परत एकदा त्या रेश्माचा चेहरा आला. प्रचंड मोठ्या कष्टानं त्यानं तो चेहरा दूर सारला. आता त्याला तिच्याबद्दल विचार करायचा नव्हता. माहीच्या आणि त्याच्या नात्यामधला गुंता सोडवणं फार गरजेचं होतं. तिच्याइतकं महत्त्वाचं कुणीच नव्हतं. “तुला माझ्या आयुष्यात काहीही किंमत नाही” तो  स्वत:शीच म्हटल्यासारखा तिला म्हणाला. 

“पण तिला विसरूसुद्धा शकत नाहीस” माहीचा आवाज आला. त्यानं नजर वर करून पाहिलं. अख्खा फ्लॅट अंधारामध्ये बुडालेला होता. थोडंसं पुढे वाकून त्यानं बेडरूममध्ये झोपलेल्या माहीकडे पाहिलं. ती शांत गाढ झोपेत होती. भिंतीवरचं घड्याळ पहाटेचे साडेचार वाजल्याचं सांगत होतं. म्हणजे एवढा वेळ इथंच त्याचा डोळा लागलेला असणार, पण तो झोपला नव्हता हे निश्चित. बाथरूममध्ये जाऊन त्यानं चेहर्‍यावर पाण्याचे हपकारे मारले. डोळ्यांतली जळजळ तरी थांबली नाही. आरश्यात त्यानं स्वत:चाच चेहरा पाहिला. खूप वर्षांनी पाहत असल्यासारखा निरखून. आपणच आपल्याला ओळखू येत नाहीये हे जाणवून परत अस्वस्थ झाला. नक्की कधी हरवलास? त्यानं आरश्यामधल्या प्रतिबिंबाला विचारलं. उत्तर दोघांकडंही नव्हतं. 


काहीच न सुचल्यासारखा तो परत बेडरूममध्ये आला. माहीच्या बाजूला बसून त्यानं तिच्या पोटावरून हात फिरवला. “इथं आतमध्ये नवीन तरारून येणार्‍या जीवनाचा एक अंश आहे.. आणि इथं बाहेर एका सडून गेलेल्या नात्याचं ओझं बाळगणारा एक वेडा” त्यानं माहीच्या गालांवर त्याचे ओठ टेकवले. पुन्हा एकदा तिच्या शांत चेहर्‍यावर पसरलेली ती स्निग्धता तो बघत राहिला.. “कसं जमलं माही तुला? कुणाहीबद्दल.. अगदी ज्या बाईनं तुला विकलं होतं, तिलासुद्धा माफ करणं कसं जमलं? कुठून आणतेस ती शक्ती...” 


तो असाच चौदा पंधरा वर्षाचा असेल. आरती एकदा त्याला घेऊन गावाजवळच्या कुठल्यातरी देवळांत गेली होती. त्याला जायचं नव्हतं, पण तिनं दोन तीन महिने खूप हट्ट केला, म्हणून तो घेऊन आला होता. एस्टीमधून उतरायचं आणि मग चालत तासभर. जंगलामधलं देवीचं देऊळ. तिचं नावसुद्धा कदाचित आसपास कुणाला माहित नसणार. “इथं आसपास झाडं जळाल्याचा वास येतोय, वणवा पेटलाय, परत जाऊ या.” तो वाटेमध्ये चालताना तिला सांगत होता. पण तिचं त्या पायवाटेवरून चालताना लक्षच नव्हतं. “पाऊस येईल” मध्येच कधीतरी ती एकदा  म्हणाली. 

आडरानात एकाकी असलेलं ते देऊळ. केव्हातरी असंच पडून झडून गेलेलं. आतमध्ये कसल्यातरी देवीचा तांदळा. वर्षानुवर्षं कुणीही पूजा न केलेला. तिनं मात्र पद्धतशीर रीत्या बसून देवीची ओटी भरली, निरांजन लावलं, अगरबत्त्ती लावली, त्याच्या हातात तिनं दिलेला नारळ त्यानं देवीसमोर फोडला. त्याचा मुळातलाच अबोलपणा हल्ली खूपच वाढला होता. इतका की त्याला व्यवस्थितेपणे न ओळखणारे लोक “मौना” समजायला लागले होते. आताही तो एकही शब्द न बोलता देवळांतून बाहेर आला, आणि परतीच्या वाटेवर चालू लागला. 


“इथं थोडावेळ थांब” आरती सहजपणे म्हणाली. तिची नजर आजूबाजूला भिरभिरत फिरली. “ही शेखरची फार आवडती जागा होती. आम्ही दोघं लग्नाआधी इथंच भेटायचो” तो हसला. आरती फार क्वचित त्याच्या वडलांविषयी बोलायची, पण जेव्हा बोलायची तेव्हा ते ऐकायला त्याला फार आवडायचं. गावामध्ये फारसं कुणी त्याला शेखरविषयी बोलताना दिसायचं नाही. गावच्या सध्या असलेल्या मालकांची दहशतच तेवढी होती. लहान असताना “तुझ्या आईला तुझा बाप असिफ की शेखर ते माहित नव्हतं, म्हणून तिनं दोन्ही बापांची नावं तुला दिली” असल्या विनोदांमधूनच त्याला बाप भेटत गेला होता. आता थोडं समजायला लागल्यावर तो फार भला माणूस होता, इथपासून ते त्यानं गावासाठी प्राण दिले वगैरे बरंच काही ऐकत गेला. पण तरीही “आपले वडील कसे होते” हे त्याला आजवर कधीही कळलं नव्हतं. देवळाच्या आसपास कुठंतरी दूरवरून धुमसणार्‍या ज्वालेचा वास येत राहिला, पण आता त्याला त्याची अजिबात तमा नव्हती. आरती पुढं कितीतरी वेळ बोलत राहिली. शेखरच्या गप्पा, शेखरचं वागणं, शेखरच्या डोक्यामधल्या वेगवेगळ्या कल्पना त्याला सांगत राहिली. आज ती कदाचित वेडी आरती नव्ह्ती. मनाच्या कोपर्‍यामधे कुठंतरी तिनं स्वत:च्या हातानं पुरून टाकलेली ही आरती आज परत जिवंत झाली होती. या आरतीच्या विश्वामधला शेखर अजून जिवंत होता. गावाच्या भल्यासाठी काहीबाही योजना बनवणारा शेखर तिथं अजून जगत होता. तिच्यासारख्या उच्च जातीमधल्या मुलीनं त्याच्याबरोबर संसार करून आयुष्याचं वाटोळ करू नये, म्हणून तिला समजावून परत फिरणारा शेखर आणि तरीही हट्टानं, निग्रहानं त्याचाच हात धरून सोबत चालणारी आरती. स्वत:च्या घरामध्ये कसल्याही सुखाची कमतरता नसलेली आरती शेखरच्या झोपडीमध्ये येऊन चुलीसाठी लाकडं फोडायला शिकली. त्याच्याबरोबर पंचक्रोशीमध्ये फिरून चार लोकांशी बोलायला शिकली. त्याच्या प्रत्येक स्वप्नाला तिनं नुसतं तिच्या नजरेमध्ये पाहिलंच नाही तर, त्या स्वप्नपूर्तीसाठी झटायला शिकली. बॅंकेमध्ये नोकरी करणारी ती, आणि एकही पैसा न  कमावता केवळ समाजसेवेचा ध्यास घेतलेला तो. हा संसारच जगावेगळा होता. तरीही तिनं निभावला होता. “इथं दर आठवड्याला आम्ही चालत यायचो, आणि मध्यरात्र होइपर्यंत गप्पा मारायचो. गप्पा नाहीच, आमचे वादविवाद जास्त. एरवी शेखरला माझ्याकडं बघायलासुद्धा फुरसत नसायची. पण इथं आला की तो वेळ फक्त माझा आणि त्याचा. आम्ही खूप ठरवलं होतं, आपल्याला एकच मुलगी हवी. तिला खूप शिकवायचं. स्वत:च्या पायावर उभं करायचं... मी जे नाव सुचवायचे ते त्याला आवडायचं नाही. आणि तो तर बाराखडीमधली वाट्टेल ती अक्षरं घेऊन नाव बनवायचा.... काहीही मनात येईल ते. मग आमची भांडणं व्हायची. त्याला धार्मिक अर्थ असलेलं संस्कृत नाव नको हवं होतं, आणि मला नाव अर्थपूर्ण, काहीतरी सांगणारं असं हवं होतं.” आरती बोलत राहिली. “आम्ही असे भांडायला लागलो की त्याचा बेस्ट फ्रेण्ड असिफ खूप हसायचा, म्हणायचा बघ आरती, तुला मुलगाच होणार.”


तिचं बोलणं ऐकत असताना त्याच्या डोळ्यांमधून पाणी कधी आलं ते समजलंच नाही. “असिफचंच म्हणणं खरं ठरलं. जेव्हा बर्थ सर्टिफीकेट्वर तुझं नाव घालायची वेळ आली तेव्हा तो आणि शेखर दोघंही आसपास नव्हते. अन्यथा मी त्यांना चिडवून दाखवलं असतं की पाहिलंत, हे मी आधीच ठरवलं होतं. मला मुलगा झाला तर मी त्याचं नाव असिफच ठेवणार होते. असिफ... कसलंही धार्मिक अर्थ नाही. संस्कृत तर बिलकुल नाही. आणि अर्थ... माझ्या मुलाच्या नावाचा अर्थच मुळात क्षमा आहे.”


ती बोलत असतानाच अचानक मुसळधार पावसाला सुरूवात झाली. तिचा हात धरून तो धावत देवळामध्ये आला. मागे जंगलात कुठंतरी पेटलेला वणवा आता शांत होणार होता. देवीच्या समोर पेटवलेलं निरांजन मात्र एकटक मंद प्रकाशात तेवत होतं. कितीतरी वेळ तो त्या निरांजनाकडं बघत राहिला. माहीच्या नजरेसारखंच दिसणारं ते निरांजन. अंधार्‍या जागी असतानाच त्याची ज्योत किती शक्तीमान आहे ते समजतं. तो निर्मळपणा, निखळपणा, त्याच्या अस्तित्त्वामध्ये तिचं अस्तित्त्व विरघळून जाणं. या नात्याचं बदललेलं प्रत्येक रूप तिच्यासाठी अनपेक्षित होतं, हवंहवंसं वाटणारं होतं. पण मग तरीही तिला सतत डाचत राहणारं असं काहीतरी होतंच या नात्यामध्ये. नक्की काय होतं!!! काय खुपतंय तुझ्या मनामध्ये? त्यानं परत एकदा विचारलं. देवळामधलं निरांजन त्याच्याकडे बघून केवळ हसलं. 

कसल्यातरी तिरीमिरीत तो उठला.  त्याच्या स्टडीरूममध्ये येऊन त्यानं दिसेल तो कॅनव्हास पुढं ओढला. बाजूला पडलेल्या रंगांच्या ट्युब हातात घेतल्या. समोर लालपिवळ्याकेशरी रंगांमध्ये वणवा पेटलेला होता. त्यानं रंग हातावर घेतला, आणि खसाखसा त्या कॅनव्हासवर माखायला सुरूवात केली.  पेटलेल्या वणव्यावर हिरव्यानिळ्या रंगांचा पाऊस बरसायला सुरूवात झाली होती.  

(समाप्त)